Accident : दुर्दैवी! ट्रकमधील लोखंडी प्लेटांखाली दबून चार जणांचा जागीच मृत्यू!

  89

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण रस्ते (Accident) अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ट्रकमधील सेंट्रिंग प्लेट अंगावर पडल्यामध्ये ४ मजुरांचा मृत्यू झाला.



मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. ट्रकमधील लोखंडी सेंट्रिंग प्लेट अंगावर पडून चार मजुरांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील खाट विकणारे पाच परप्रांतीय मजूर हे सोमवारी कर्नाटक येथून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी लोखंडी प्लेट नेणाऱ्या ट्रकने जात होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव महामार्गावरील टुणकी येथील ढाब्याजवळ चालकाने ब्रेक दाबताच ट्रकमधील सेंट्रिंगच्या लोखंडी प्लेटांचा ढीग मजुरांच्या अंगावर पडला. गाढ झोपेमध्ये असताना ही घटना घडली. अंगावर लोखंडी प्लेट पडल्यामुळे मजुरांचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेमध्ये दिवाण मानसिंग गरासिया, विजय कंवरलाल गरासिया, निर्मल राजूजी गरासिया आणि विक्रम मदनजी कछावा अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व मध्य प्रदेशच्या निमच जिल्ह्यातील खडावदा येथे राहणारे होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे मजूर कर्नाटकात गेले होते. अपघातामध्ये मृत्यू झालेले चार जण हे गरीब कुटुंबातील असून ते खाट विणण्याचा व्यवसाय करत होते. या अपघाताचा तपास संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे. (Accident)

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या