Mirkarwada Port : एका दिवसात मिरकरवाडा बंदराचा चेहरा मोहरा बदलला

६ जेसीबी ६ डंपरच्या साहाय्याने राडारोडा हटवण्याचे काम सुरु


अतिक्रमण हटवल्यानंतर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या बुलडोझर कारवाईचे स्वागत


रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिक मिरकरवाडा बंदरातील (Mirkarwada Port) अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी जमीनदोस्त झालेल्या बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. सगळं राडारोडा डंपरच्या साहाय्याने बंदर परिसरातून हटवण्यात आला. यामुळे मिरकारकवाडा परिसराचे संपूर्ण रूप पालटून गेले होते. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या या धडक कारवाईचे रत्नागिरी शहर आणि परिसरासह संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. तर स्थानिक रत्नागिरीकरांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.


रत्नागिरी सह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मोठ्या व्यापारी बंदराला अतिक्रमणाने घेतल्यामुळे इथला विकास खुंटला होता. केवळ मत्स्य व्यवसायच नव्हे तर किनारपट्टी सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यात महत्वाचा बुलडोझर कारवाईचा निर्णय घेत अवघ्या १५ दिवसांमध्ये मिरकरवाडा बंदर अतिक्रमणमुक्त झाले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या सुमारे ११ हेक्टर जागेमध्ये ३१९ बांधकामे अनधिकृत ठरवण्यात आली आणि पूर्वसूचना देऊन २७ जानेवारीरोजी पहाटे पासून सुरु असलेल्या कारवाईत सर्वच्या सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पहिल्या दिवशी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी जमा झालेला राडारोडा हटवण्याचे काम सकाळपासून हाती घेण्यात आले होते. यासाठी ६ जेसीबी आणि ६ डंपर तैनात करण्यात आले होते. चिरे, पत्रे, लाकडे, अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात असलयाने बांधकामे जमीनदोस्त करण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावण्याचे काम आव्हानात्मक होते.



तरीही सहाय्यक संचालक मत्स्य व्यवसाय व्ही. एम. भादुले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव, बंदर अधिकारी, बंदर निरीक्षक, जीवन सावंत आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता. दिवसभर हि स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याने मिरकरवाडा बंदराचा चेहरामोहरा संध्याकाळी एकदम बदलून गेलेला पाहायला मिळाला. दाटीवाटीने बांधलेली बांधकामे, अस्वच्छता यामुळे या परिसराला बकाल रूप प्राप्त झाले होते. मात्र संध्याकाळी परिसर एकदम पालटून गेलेला पाहायला मिळाला. तरीही स्वच्छतेचे बरेचसे काम अद्यापही राहिलेले असून त्याला एक दोन दिवस जाण्याची शक्यता आहे.


मात्र या बेधडक कारवाईचे रत्नागिरीकरांनी स्वागत केले आहे. अनेक दशकांपासून मिरकरवाडा हे बंदर अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकलेले होते. त्याला पुन्हा बंदर हे रूप प्राप्त होईल असा विश्वास सुद्धा रत्नागिरीकरांना वाटत नसताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या बुलडोझर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सकरात्मक प्रतिसाद मिळत असून सर्वत्र ना. नितेश राणे यांचे अभिनंदन केले जात असून आभार व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Konkan Railway Monsoon Schedule : महत्वाची बातमी! कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक जाहीर; १५ जूनपासून होणार प्रवासात मोठा बदल

कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही

Lashkar-e-Taiba : इस्रायलला मान्यता दिल्यास सरकार पाडू; लष्कर-ए-तैयबाची पाकिस्तानला उघडी धमकी

इस्लामाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अब्राहम करारा’अंतर्गत पाकिस्तानसह अनेक मुस्लिम

पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी एकाचा धरणात बुडून मृत्यू ऐन ईदच्या दिवशीच घटना घडल्याने सर्वत्र हळहळ

चाळीसगाव तालुक्यातील पिराचे बोरखेडा येथील धरणात पोहायला गेलेल्या चाळीसगाव शहरातील पाच तरुणांपैकी एका तरुणाचा

Food and Drug Administration Raids : ‘आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर थेट कारवाई’; राज्यभर अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत ३३ आरोपींना अटक

मुंबई : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई सुरू

 स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुक : २०२६ ;अमरावतीमधून प्रवीण पोटे यांना भाजपची उमेदवारी

भाजपाने अमरावती मतदारसंघात प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे त्यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचे नेतृत्व

Bashir Badr : मशहूर शायर डॉ. बशीर बद्र यांचं निधन; शायरीचं एक युग संपलं

उर्दू शायरीतून दुनियेला भावूक करणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध शायर आणि गझलकार डॉ. बशीर बद्र यांचं गुरुवारी