Mirkarwada Port : एका दिवसात मिरकरवाडा बंदराचा चेहरा मोहरा बदलला

६ जेसीबी ६ डंपरच्या साहाय्याने राडारोडा हटवण्याचे काम सुरु


अतिक्रमण हटवल्यानंतर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या बुलडोझर कारवाईचे स्वागत


रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिक मिरकरवाडा बंदरातील (Mirkarwada Port) अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी जमीनदोस्त झालेल्या बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. सगळं राडारोडा डंपरच्या साहाय्याने बंदर परिसरातून हटवण्यात आला. यामुळे मिरकारकवाडा परिसराचे संपूर्ण रूप पालटून गेले होते. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या या धडक कारवाईचे रत्नागिरी शहर आणि परिसरासह संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. तर स्थानिक रत्नागिरीकरांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे.


रत्नागिरी सह संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मोठ्या व्यापारी बंदराला अतिक्रमणाने घेतल्यामुळे इथला विकास खुंटला होता. केवळ मत्स्य व्यवसायच नव्हे तर किनारपट्टी सुरक्षितता सुद्धा धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यात महत्वाचा बुलडोझर कारवाईचा निर्णय घेत अवघ्या १५ दिवसांमध्ये मिरकरवाडा बंदर अतिक्रमणमुक्त झाले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या सुमारे ११ हेक्टर जागेमध्ये ३१९ बांधकामे अनधिकृत ठरवण्यात आली आणि पूर्वसूचना देऊन २७ जानेवारीरोजी पहाटे पासून सुरु असलेल्या कारवाईत सर्वच्या सर्व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पहिल्या दिवशी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी जमा झालेला राडारोडा हटवण्याचे काम सकाळपासून हाती घेण्यात आले होते. यासाठी ६ जेसीबी आणि ६ डंपर तैनात करण्यात आले होते. चिरे, पत्रे, लाकडे, अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात असलयाने बांधकामे जमीनदोस्त करण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावण्याचे काम आव्हानात्मक होते.



तरीही सहाय्यक संचालक मत्स्य व्यवसाय व्ही. एम. भादुले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव, बंदर अधिकारी, बंदर निरीक्षक, जीवन सावंत आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता. दिवसभर हि स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्याने मिरकरवाडा बंदराचा चेहरामोहरा संध्याकाळी एकदम बदलून गेलेला पाहायला मिळाला. दाटीवाटीने बांधलेली बांधकामे, अस्वच्छता यामुळे या परिसराला बकाल रूप प्राप्त झाले होते. मात्र संध्याकाळी परिसर एकदम पालटून गेलेला पाहायला मिळाला. तरीही स्वच्छतेचे बरेचसे काम अद्यापही राहिलेले असून त्याला एक दोन दिवस जाण्याची शक्यता आहे.


मात्र या बेधडक कारवाईचे रत्नागिरीकरांनी स्वागत केले आहे. अनेक दशकांपासून मिरकरवाडा हे बंदर अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकलेले होते. त्याला पुन्हा बंदर हे रूप प्राप्त होईल असा विश्वास सुद्धा रत्नागिरीकरांना वाटत नसताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या बुलडोझर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सकरात्मक प्रतिसाद मिळत असून सर्वत्र ना. नितेश राणे यांचे अभिनंदन केले जात असून आभार व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये

अखेर Vantara आरोपमुक्त! न्यायालयातील विजयासह रिलायन्सकडून प्रतिकिया म्हणाले....' भारताच्या...

मोहित सोमण:आज अखेर रिलायन्स फाउंडेशनच्या 'वनतारा' या देशातील सर्वात मोठ्या प्राणी पुनर्वसन प्रकल्पाला (Rehabilitation Centre)

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

अरे बापरे ITR भरताना शेवटच्या दिवशीच वेबसाईट हँग? करदात्यांची तक्रार 'हे' उपाय करुन पहा

प्रतिनिधी:आज आयटीआर भरायचा शेवटचा दिवस आहे.सकाळपासूनच मात्र आयटीआर संकेतस्थळावरील करदात्यांना तांत्रिक