GBS Treatment : कमला नेहरू रुग्णालयात 'जीबीएस'च्या रुग्णांवर मोफत उपचार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत असलेली ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या पाहता महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस च्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. या आजाराचे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या ‘शहरी गरीब योजने’अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत देखील केली जाणार आहे.



पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील खडकवासला, किरकिटवाडी, डीएसके विश्व यासह आजुबाजुच्या परिसरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. या भागातील नागरिकांना ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो ते पाणी दुषित असल्याने या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांकडून केला जात आहे. या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Ketan Agrawal Murder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; लोहगडावर सिया गोयलकडून पोलिसांनी केले सीन रिक्रिएशन

पुणे : पुण्यातील (Pune) उद्योजक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून पुणे ग्रामीण

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो