IND vs ENG: भारत-इंग्लंड आज तिसरा टी-२० सामना, टीम इंडिया विजयी आघाडी घेणार?

मुंबई: भारत आणि इंग्लंंड(IND vs ENG) यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सलग विजयी हॅटट्रिक लगावत भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल.


तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला मात्र अद्याप या मालिकेत विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे तिसरा सामना जिंकत इंग्लंडचा संघ या मालिकेत रंजकता आणण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईमधील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने २ विकेटनी विजय मिळवला होता. या सामन्याचा हिरो तिलक वर्मा ठरला होता. भारताचा तिसरा सामना आता राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये रंगेल. या सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग ११ची घोषणा करण्यात आली.



तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या प्लेईंग ११मध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंग्लंडचा संघ सुरूवातीचे दोन सामने हरले आहेत. या दोन्ही पराभवानंतरही बटलरने प्लेईंग ११मध्ये बदल केलेला नाही.


राजकोटमध्ये असा आहे भारताचा रेकॉर्ड


भारताने हा तिसरा सामना जिंकला तर ही मालिका त्यांच्या नावावर होईल. या पद्धतीने ते इंग्लंडविरुद्ध सलग ५वी टी-२० मालिका जिंकतील. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ८ द्विपक्षीय टी-२० मालिका खेळवण्यात आली आहे. यात भारतीय संघाने ४ मालिका जिंकल्या तर ३ गमावल्या आहेत. एक मालिका अनिर्णीत राहिली.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत