IND vs ENG: भारत-इंग्लंड आज तिसरा टी-२० सामना, टीम इंडिया विजयी आघाडी घेणार?

  52

मुंबई: भारत आणि इंग्लंंड(IND vs ENG) यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सलग विजयी हॅटट्रिक लगावत भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल.


तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला मात्र अद्याप या मालिकेत विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे तिसरा सामना जिंकत इंग्लंडचा संघ या मालिकेत रंजकता आणण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईमधील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने २ विकेटनी विजय मिळवला होता. या सामन्याचा हिरो तिलक वर्मा ठरला होता. भारताचा तिसरा सामना आता राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये रंगेल. या सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग ११ची घोषणा करण्यात आली.



तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या प्लेईंग ११मध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंग्लंडचा संघ सुरूवातीचे दोन सामने हरले आहेत. या दोन्ही पराभवानंतरही बटलरने प्लेईंग ११मध्ये बदल केलेला नाही.


राजकोटमध्ये असा आहे भारताचा रेकॉर्ड


भारताने हा तिसरा सामना जिंकला तर ही मालिका त्यांच्या नावावर होईल. या पद्धतीने ते इंग्लंडविरुद्ध सलग ५वी टी-२० मालिका जिंकतील. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ८ द्विपक्षीय टी-२० मालिका खेळवण्यात आली आहे. यात भारतीय संघाने ४ मालिका जिंकल्या तर ३ गमावल्या आहेत. एक मालिका अनिर्णीत राहिली.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला