IND vs ENG: भारत-इंग्लंड आज तिसरा टी-२० सामना, टीम इंडिया विजयी आघाडी घेणार?

  65

मुंबई: भारत आणि इंग्लंंड(IND vs ENG) यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सलग विजयी हॅटट्रिक लगावत भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल.


तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला मात्र अद्याप या मालिकेत विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे तिसरा सामना जिंकत इंग्लंडचा संघ या मालिकेत रंजकता आणण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईमधील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने २ विकेटनी विजय मिळवला होता. या सामन्याचा हिरो तिलक वर्मा ठरला होता. भारताचा तिसरा सामना आता राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये रंगेल. या सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग ११ची घोषणा करण्यात आली.



तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या प्लेईंग ११मध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंग्लंडचा संघ सुरूवातीचे दोन सामने हरले आहेत. या दोन्ही पराभवानंतरही बटलरने प्लेईंग ११मध्ये बदल केलेला नाही.


राजकोटमध्ये असा आहे भारताचा रेकॉर्ड


भारताने हा तिसरा सामना जिंकला तर ही मालिका त्यांच्या नावावर होईल. या पद्धतीने ते इंग्लंडविरुद्ध सलग ५वी टी-२० मालिका जिंकतील. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ८ द्विपक्षीय टी-२० मालिका खेळवण्यात आली आहे. यात भारतीय संघाने ४ मालिका जिंकल्या तर ३ गमावल्या आहेत. एक मालिका अनिर्णीत राहिली.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे