IND vs ENG: भारत-इंग्लंड आज तिसरा टी-२० सामना, टीम इंडिया विजयी आघाडी घेणार?

  61

मुंबई: भारत आणि इंग्लंंड(IND vs ENG) यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सलग विजयी हॅटट्रिक लगावत भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल.


तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाला मात्र अद्याप या मालिकेत विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे तिसरा सामना जिंकत इंग्लंडचा संघ या मालिकेत रंजकता आणण्याचा प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईमधील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने २ विकेटनी विजय मिळवला होता. या सामन्याचा हिरो तिलक वर्मा ठरला होता. भारताचा तिसरा सामना आता राजकोटच्या निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये रंगेल. या सामन्यासाठी इंग्लंडकडून प्लेईंग ११ची घोषणा करण्यात आली.



तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या प्लेईंग ११मध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंग्लंडचा संघ सुरूवातीचे दोन सामने हरले आहेत. या दोन्ही पराभवानंतरही बटलरने प्लेईंग ११मध्ये बदल केलेला नाही.


राजकोटमध्ये असा आहे भारताचा रेकॉर्ड


भारताने हा तिसरा सामना जिंकला तर ही मालिका त्यांच्या नावावर होईल. या पद्धतीने ते इंग्लंडविरुद्ध सलग ५वी टी-२० मालिका जिंकतील. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ८ द्विपक्षीय टी-२० मालिका खेळवण्यात आली आहे. यात भारतीय संघाने ४ मालिका जिंकल्या तर ३ गमावल्या आहेत. एक मालिका अनिर्णीत राहिली.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे