IND vs ENG : तिसऱ्या टी-२०मध्ये विजयासाठी भारतासमोर १७२ धावांचे आव्हान

राजकोट: टीम इंडिया आणि इंग्लंडचा संघ यांच्यात राजकोट येथे आज तिसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने २० षटकांत १७१ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान मिळाले आहे. बेन डकेटने २६ बॉलवर अर्धशतक ठोकले.


इंग्लंडने २० षटकांत ९ विकेट गमावताना १७१ धावा केल्या. टीम इंडियासाठी वरूण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट मिळवल्या. तर इंग्लंडसाठी बेन डकेटने अर्धशतक लगावले. त्याने २८ चेंडूचा सामना करताना ५१ धावा केल्या. डकेटने ७ चौकार आणि २ षटकार लावले. तर दुसरीकडे लियाम लिव्हिंगस्टोनने ४३ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. जोस बटलरने २४ धावा करत योगदान दिले.



५ विकेटसह वरूण चक्रवर्तीने रचला इतिहास


वरूण चक्रवर्तीने ५ विकेट घेण्यासोबतच इतिहास रचला आहे. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्वीपक्षीय टी-२० मालिकेत १०हून अधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी युजवेंद्रच्या नावावर एका मालिकेत सर्वाधिक ८ विकेट घेण्याचा मान होता. इंग्लंडकडून एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड क्रिस जॉर्डनच्या नावावर आहे.
Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून