सावधान! परीक्षेत मोबाईल वापरल्यास २ वर्षांची बंदी

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सीबीएसई मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थी परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त आहेत.


दरम्यान, सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार जर एखाद्या विद्यार्थ्याकडे मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळले, तर त्याला पुढील दोन वर्षे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.



यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्याना एका वर्षासाठी परीक्षेवर बंदी घालण्याची तरतूद होती. याविषयी अधिक माहिती देताना सीबीएसई परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज म्हणाले की, परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा मोबाईल वापरले किंवा ठेवले, तर विद्यार्थी केवळ या वर्षीच नव्हे तर पुढच्या वर्षीही परीक्षेला बसू शकणार नाहीत. जर कोणत्याही उमेदवाराने मार्गदर्शक तत्त्वे पाळली नाहीत, तर त्याला दोन वर्षांपर्यंत बंदी घातली जाऊ शकते.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात