सावधान! परीक्षेत मोबाईल वापरल्यास २ वर्षांची बंदी

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सीबीएसई मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थी परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त आहेत.


दरम्यान, सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार जर एखाद्या विद्यार्थ्याकडे मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळले, तर त्याला पुढील दोन वर्षे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.



यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्याना एका वर्षासाठी परीक्षेवर बंदी घालण्याची तरतूद होती. याविषयी अधिक माहिती देताना सीबीएसई परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज म्हणाले की, परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा मोबाईल वापरले किंवा ठेवले, तर विद्यार्थी केवळ या वर्षीच नव्हे तर पुढच्या वर्षीही परीक्षेला बसू शकणार नाहीत. जर कोणत्याही उमेदवाराने मार्गदर्शक तत्त्वे पाळली नाहीत, तर त्याला दोन वर्षांपर्यंत बंदी घातली जाऊ शकते.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध