नवी दिल्ली : संसदेने वक्फ बोर्ड विधेयकाचा मसुदा संयुक्त संसदीय समितीकडे विचारासाठी पाठवला होता. या समितीपुढे आतापर्यंत अनेक सुधारणा प्रस्ताव म्हणून सादर झाल्या. यातील १४ सुधारणांवर विचार करण्याचा निर्णय संयुक्त संसदीय समितीने घेतला आणि इतर ४४ सूचना संयुक्त संसदीय समितीने बाद केल्या आहेत. आता बुधवार २९ जानेवारी रोजी संयुक्त संसदीय समितीची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत १४ सुधारणांबाबत पुढे काय करायचे याचा अंतिम निर्णय होईल आणि समितीचा अहवाल संसदेकडे पुढील कारवाईसाठी जाईल. यामुळे वक्फ बोर्ड विधेयक प्रकरणी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित मसुदा सादर होण्याची शक्यता आहे.
भाजपा खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समितीची बैठक झाली. या बैठकीत मतदान झाले. मतदानाअंती बहुमताने फक्त १४ सुधारणांवर विचार करण्याचा आणि इतर ४४ सुधारणा बाद करण्याचा निर्णय झाला. यामुळे विरोधक नाराज झाले. पण हा मतदानाचा कौल असल्यामुळे संसदीय समितीला याआधारे पुढील कामकाज करावे लागेल, असे जगदंबिका पाल म्हणाले.
संसदेने वक्फ बोर्ड विधेयकाचा मसुदा नव्या स्वरुपात तयार करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली. माजी काँग्रेस नेते आणि सध्या भाजपाचे खासदार असलेले जगदंबिका पाल यांची संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. यानंतर समितीच्या बैठका झाल्या आणि चर्चेअंती १४ सुधारणांवर विचार करण्याचा निर्णय झाला. या संदर्भात समितीची महत्त्वाची बैठक बुधवार २९ जानेवारी रोजी आहे. या बैठकीत काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे. वक्फ बोर्ड विधेयक प्रकरणी संयुक्त संसदीय समितीला त्यांचा अहवाल ३१ जानेवारी पर्यंत संसदेला सादर करायचा आहे. यामुळे २९ जानेवारी रोजी काय घडणार यावरुन चर्चेला उधाण आले आहे.
संयुक्त संसदीय समितीने सुचवलेल्या प्रमुख सुधारणा
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…