तिसऱ्या मजल्यावरुन कोसळला दोन वर्षांचा चिमुरडा

  59

डोंबिवली : एका तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन दोन वर्षांचा चिमुरडा खाली कोसळला. ही धक्कादायक घटना डोंबिवलीतील देवीचा पाडा येथे घडली. सगळा घटनाक्रम सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला.





चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडत असल्याचे लक्षात येताच भावेश म्हात्रेने त्याला हवेत झेलण्यासाठी धाव घेतली. भावेश याच इमारतीत ग्राहकाला घर दाखवण्यासाठी आला होता. घर दाखवून झाल्यावर तो ग्राहकासोबत बाहेर पडत होता. सहज इमारतीकडे बघत आवारातून बाहेर पडत असताना भावेशला चिमुरडा पडत असल्याचे लक्षात आले आणि त्याने धाव घेतली. अखेर चिमुरडा भावेशच्या हाताला लागून नंतर खाली जमिनीवर पडला. भावेशने प्रसंगावधान राखत पाय पटकन पुढे केले आणि चिमुरड्याला पायावर झेलण्याचा प्रयत्न केला. यामुळे चिमुरड्याला मोठी दुखापत झाली नाही. आजूबाजूच्या नागरिकांसह आईवडिलांनी तातडीने चिमुरड्याला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन चिमुरडा सुखरुप असल्याचे सांगितल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.



हाती आलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात राहणारा भावेश म्हात्रे हा ३५ वर्षीय युवक घराच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. तो शनिवार २५ जानेवारी रोजी दुपारी अनुराज इमारतीत ग्राहकाला घर दाखवण्यासाठी गेला होता. घर दाखवून इमारती बाहेर येत असताना याच इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील घरातला चिमुरडा खाली पडत असल्याचे लक्षात आले आणि भावेशने धाव घेतली.



ज्या घरातून चिमुरडा पडला त्या घरात रंगकाम सुरू होते. रंगकामासाठी खिडकीच्या काचा आणि इतर सामान काढून ठेवले होते. यामुळे निर्माण झालेल्या मोकळ्या जागेतून चिमुरडा खेळता खेळता खाली पडला. पण भावेश धावून आला आणि मोठे संकट टळले.

भावेश देवासारखा धावून आला आणि चिमुरड्याच्या जीवावरचे मोठे संकट टळले. चिमुरड्याच्या बाबतीत 'देव तारी त्याला कोण मारी' असाच प्रकार घडल्याची चर्चा परिसरात सुरू झाली.
Comments
Add Comment

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे