मुंबई : नुकतेच एसटी महामंडळाने एसटीच्या दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सोयीस्कर असणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचा प्रवासही महाग होणार आहे. १ फेब्रुवारीपासून रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ लागू होणार आहे. (Taxi -Auto Fare Hike)
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडेवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून रिक्षाचे भाडे २३ रुपयांवरून २६ रुपये तर टॅक्सीचे भाडे २८ वरून ३१ रुपये होणार आहे.
मीटर रिक्षा आणि टॅक्सीसोबतच कूल कॅबचेही दर २० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. कूल कॅबसाठी पूर्वीचे प्रतिकिमी भाडे २६.७१ रुपयांवर ३७.०२ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे कूल कॅबसाठी दीड किमीपर्यंतच्या प्रवासासाठी आता ४० रुपयांऐवजी ४८ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर प्रतिकिमीसाठी ३७ रुपये मोजावे लागतील.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…