मनोहर जोशींना पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. यंदा सात मान्यवरांना पद्मविभूषण आणि १९ जणांना पद्मभूषण तर ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर पद्मश्री सेच गझल गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉलिवूडचे र्माते-दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकि‍र्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री जाहीर झाला आहे. यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचा समावेश आहे. या वर्षी एकूण १३९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. यात २३ महिला तर १० परदेशी नागरिक आहेत. यातील १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.





व्यापार आणि उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.



अच्युत पालव – कलाक्षेत्र
अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
अशोक सराफ – कलाक्षेत्र
अश्विनी भिडे-देशपांडे – कलाक्षेत्र
चैत्राम पवार – सामाजिक सेवा
जसपिंदर नरुला – कलाक्षेत्र
मारुती चितमपल्ली – साहित्यिक आणि अभ्यासक
रणेंद्र मुजुमदार – कलाक्षेत्र
सुभाष शर्मा – शेती
वासुदेव कामत – कलाक्षेत्र
विलास डांगरे – औषध
Comments
Add Comment

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण

Wall collapse near Hospital : रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ३ मुलांचा समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत बोअरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयाजवळची संरक्षक भिंत कोसळून सात

गॅस सिलेंडर मोफत हवा आहे ? मग मोदी सरकारची 'ही' भन्नाट योजना तुम्हांला माहित असायलाच हवी

ग्रामीण भागात अजूनही अनेक महिला पारंपरिक इंधनावर स्वयंपाक करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

नवी दिल्ली : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर