मनोहर जोशींना पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. यंदा सात मान्यवरांना पद्मविभूषण आणि १९ जणांना पद्मभूषण तर ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर पद्मश्री सेच गझल गायक पंकज उधास यांनाही मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉलिवूडचे र्माते-दिग्दर्शक शेखर कपूर यांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकि‍र्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री जाहीर झाला आहे. यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे, पार्श्व गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचा समावेश आहे. या वर्षी एकूण १३९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. यात २३ महिला तर १० परदेशी नागरिक आहेत. यातील १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.





व्यापार आणि उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहेत.



अच्युत पालव – कलाक्षेत्र
अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
अशोक सराफ – कलाक्षेत्र
अश्विनी भिडे-देशपांडे – कलाक्षेत्र
चैत्राम पवार – सामाजिक सेवा
जसपिंदर नरुला – कलाक्षेत्र
मारुती चितमपल्ली – साहित्यिक आणि अभ्यासक
रणेंद्र मुजुमदार – कलाक्षेत्र
सुभाष शर्मा – शेती
वासुदेव कामत – कलाक्षेत्र
विलास डांगरे – औषध
Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे