भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाविषयी या बाबी माहिती आहेत का ?


  1. भारत रविवार २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारताने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले. भारताने संविधान स्वीकारले. या संविधानाने ब्रिटिशांच्या 'गव्हर्मेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1935'ची जागा घेतली. संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाल्यामुळे या दिवसापासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतात २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्यासाठी संघर्ष सुरू झाला आणि संविधान स्वीकारल्यामुळे भारतात लोकांची अर्थात प्रजेची सत्ता आली. देश प्रजासत्ताक झाला. देशाला १९२९ मध्ये ब्रिटिशांच्या नेतृत्वात नियंत्रित स्वातंत्र्य मिळाले. लाहोरमध्ये काँग्रेसने १९ डिसेंबर १९२९ रोजी पूर्ण स्वराज्य मागितले. यासाठीचा संघर्ष २६ जानेवारी १९३० पासून सुरू झाला. ब्रिटिश इंडिया २६ जानेवारीला स्वातंत्र्य दिन साजरा करायची आणि १९४७ पासून १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. देशात २६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

  2. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा होत असला तरी त्याची त्याची आदल्या वर्षी जुलै महिन्यापासून सुरू होते. प्रत्यक्ष संचलनाच्या दिवशी जे संचलनात सहभागी होणार असतात ते पहाटे तीन वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी उपस्थित असतात. प्रत्यक्ष संचलनाआधी जवळपास ६०० तासांचा संचलनाचा सराव झालेला असतो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम गुरुवार २३ जानेवारी २०२५ रोजी झाली.

  3. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला एक परदेशी पाहुणा आमंत्रित केला जातो. यंदा इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रजासत्ताक दिनाचे शाही पाहुणे आहेत.

  4. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीत सुरू असताना तोफांची सलामी दिली जाते. पहिली तोफ राष्ट्रगीत सुरू होताच सलामी देते. यानंतर ५२ सेकंदांनी तोफेद्वारे दुसरी सलामी दिली जाते.

  5. दरवर्षी प्रजासत्ताक दिनासाठी एक संकल्पना निश्चित केली जाते. या संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सर्व केंद्र आणि राज्य पातळीवरील सरकारी यंत्रणा कार्यक्रमात सहभागी होताना संकल्पनेनुसार नियोजन करतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना 'स्वर्णिम भारत - विरासत और विकास' ही आहे.

  6. प्रजासत्ताक दिनासाठी कर्तव्य पथावरुन विजय चौक ते इंडिया गेट असे संचलन केले जाते. राष्ट्रपती भवन, लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीने हे संचलन सुरू असते. लाल किल्ल्यावरुन मान्यवर संचलन बघतात.

  7. पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा २६ जानेवारी १९५० रोजी नवी दिल्ली येथील आयर्विन स्टेडियम आताचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने झालेल्या संचलनात तीन हजार जवान सहभागी झाले. हवाई कसरतींमध्ये १०० विमान - हेलिकॉप्टर यांचा ताफा सहभागी झाला होता.

  8. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुलांच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची तसेच इतर अनेक सरकारी पुरस्कारांची आणि शौर्य पुरस्कारांची घोषणा केली जाते. यात नागरिकांचा गौरव करणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या घोषणेचाही समावेश असतो.






Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी