Ajit Pawar : लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पुणे : लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही,अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्याने, राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्यातील लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीनी आता राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असून ज्या अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्या लाडक्या बहिणींकडे मिळालेले पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला होता. काही महिला स्वत:हून पैसे करत आहेत, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असेही आदिती यांनी म्हटले होते. त्यामुळे, लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, सरकारकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात शासनाची भूमिका मांडत, कुठलीही रिकव्हरी नाही,असे स्पष्ट केले आहे.



लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरी पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळाला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून कोणत्याही स्वरूपात पैशाची रकव्हरी होणार नाही, असे एका वाक्यात उत्तर अजित पवारांनी सांगून टाकले.

Comments
Add Comment

Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List : कोकण ते विदर्भ अन् पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा; संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचाच डंका, विजयी नगरसेवकांची संपूर्ण यादी!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीने विजयाची

Jejuri Bhandara Fire : जेजुरीत विजयोत्सवाचे रूपांतर दुर्घटनेत! विजयाच्या गुलालात आगीचा गोळा; फटाक्यांच्या ठिणगीमुळे नगरसेवकांसह १६ जण भाजले

जेजुरी : राज्यभरात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांची धामधूम सुरू असून, विजयी उमेदवारांकडून

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘वंदे भारत’च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक

विवाहासाठी दिव्यांगांना आता मिळणार अडीच लाख रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून

निकालाआधी अनगरमध्ये भाजपने उधळला गुलाल! पहिल्यांदाच निवडणूक आणि बिनविरोध निवड

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.