Ladki Bahin Yojana : कामाठीपुरात बांगलादेशी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ!

मुंबई : देशभरात सध्या बेकायदेशीरित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई सुरु आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे अनेक बांगलादेशी राहत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. अशातच मुंबईच्या कामाठीपुरा भागातून गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या महत्त्वांकाक्षी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) बांगलादेशी महिलेने लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांचा अटक करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.


मुंबईत एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील कामाठीपुरा भागात राहणाऱ्या या बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि तिला सरकारकडून लाभही मिळाला होता. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह ५ बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.



क्राइम इंटेलिजेंस युनिटने कामाठीपुरा भागात ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर स्थलांतर करण्यास मदत केल्याबद्दल आणि त्यांना आश्रय दिल्याबद्दल महादेव यादव या ३४ वर्षीय भारतीयालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या एका महिलेचे नाव उर्मिला खातून असे असून तिने लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपयांचे दोन हप्ते मिळवले असल्याचे समोर आले आहे. या बांगलादेशी महिलेचे आधारकार्ड बनावट असल्याचा दावा केला आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता