अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांना भारतात परत आणणार

  74

परराष्ट्र प्रवक्ते जयस्वाल यांनी स्पष्ट केली भूमिका


नवी दिल्ली : अमेरिकेतील बेकायेशीर स्थलांतरितांच्या समर्थनात भारत उभा राहणार नाही. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार पावले उचलणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज, शुक्रवारी सांगितले.


यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, अमेरिका आणि इतरत्र निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सरकार परत आणण्यासाठी पावले उचलेल. त्यासाठी सर्व नागरिकांच्या राष्ट्रीयत्वाची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. भारत बेकायदेशीर स्थलांतराच्या विरोधात आहे कारण ते संघटित गुन्हेगारीशी जोडलेले आहे.


भारत-अमेरिका संबंध खूप मजबूत आणि बहुआयामी आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधही खूप चांगले आहेत. दोन्ही देशांनी व्यापाराशी संबंधित कोणत्याही बाबींवर चर्चा करण्यासाठी यंत्रणा स्थापित केल्या आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील चर्चेनुसार सुमारे १८ हजार भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवले जाऊ शकते. दरम्यान परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री २६-२७ जानेवारी रोजी चीनला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव चीनमध्ये द्विपक्षीय हिताच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील असे जयस्वाल यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने