उपासना, आराधना आणि भक्ती

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै


आपण आपला वेळ, पैसा, श्रम, मेहनत कित्येक वेळा नको त्या गोष्टीत वाया घालवत असतो. उदाहरणार्थ तथाकथित उपासनेच्या नावाखाली ज्या गोष्टी केल्या जातात व जीवनविद्या जी उपासना सांगते यात जमीन आस्मानाइतके अंतर आहे. मी या आधीही उपासना कशाला म्हणतात ते सांगितले आहे. शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे, हीच उपासना, हीच आराधना, हीच भक्ती. हे करण्याऐवजी आपण केवळ उपास, तीर्थ, यात्रा, यज्ञयाग करत बसलो तर यातून शहाणपण येणार कसे? कुठून येणार? निर्जळ उपास केल्याने प्रकृतीवर परिणाम होणार, ते त्याला व इतरांनाही भोगावे लागणार, मात्र शहाणपण कसे येणार? शहाणपण नाही तर सर्व व्यर्थ असे जीवनविद्या सांगते.


परमेश्वराचे रूप व स्वरूप समजून घेण्यातच खरे शहाणपण आहे. यात निसर्ग नियमांचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच हे निसर्ग नियम परमेश्वराचे अवयव आहेत असे जीवनविद्या सांगते. जसे आपण व आपले अवयव हे वेगळे करता येत नाहीत तसे निसर्गाचे नियम हे परमेश्वरापासून वेगळे करता येत नाहीत. ते एकरूप आहेत. हे निसर्गाचे नियम परमेश्वर मोडत नाहीत. प्रत्यक्षात परमेश्वर काही करतच नाही तर तो ते मोडणार कसे? तो केवळ आहे व त्याच्या असण्यामुळेच सर्व निर्मिती होत आहे. निसर्गाचे नियम हे परमेश्वराच्या अंगी आहेत. “आहेस तू अंगा, अंगी डोळे उघडा” असे एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. हे अंगी असलेले निसर्गाचे नियम परमेश्वर कधीच मोडत नाही. माणसे नियम करतात व माणसेच नियम मोडतात. सध्या क्रिकेटचे सामने जोरदार चालू आहेत. या खेळाचे नियम कोणी केले? माणसानेच.


खरोखर लेग बिफोर विकेट असून सुद्धा पंच बाद करत नाही, मात्र कित्येकदा लेग बिफोर विकेट नसून सुद्धा पंच बाद असा निर्णय देतात. पूर्वी असे म्हणत देखील असत की, जेव्हा सामने पाकिस्तानात खेळवले जात तेव्हा पाकिस्तानचा संघ १३ लोकांचा असे. ११ खेळाडू व २ पंच. हे आम्ही पाहिले, वाचले आहे म्हणून आम्ही सांगतो. मग त्या संस्था चालवणारे लोक शहाणे झाले आणि दुसऱ्या देशाचे पंच ठेवण्याचा नियम आणला. परमेश्वर मात्र कोणाच्याही बाबतीत स्पेशल केस करत नाही. कारण तो प्रत्यक्षात काही करतच नाही. त्याच्याकडून सगळे होते ही गोष्ट लक्षात घेतली तर मानवी जीवनात निसर्गाचे नियम अत्यंत महत्त्वाचे का आहेत हे उमजते.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा