'उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार शिवसेनेच्या वाटेवर'

दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्विर्झर्लंडमधील दावोस येथे असलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा केला. लवकरच उद्धव ठाकरे गटाला जबर धक्का बसेल, असेही उदय सामंत म्हणाले. याआधी शिवसेनेचे लोकसभेतील खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याचे भाकीत केले होते. दोन शिवसेना नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरे गटाचे काय होणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या सुमारास उदय सामंत यांचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. उदय सामंत यांनी काँग्रेसचे निवडक आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.



उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना पक्षात फूट पडणार नाही, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्योगमंत्र्यांना फक्त राजकारण करायचे असेल तर त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसमधून परत महाराष्ट्रात पाठवून द्यावे,असेही संजय राऊत म्हणाले.



महाराष्ट्र विधानसभा
एकूण सदस्य २८८
भाजपा १३२
शिवसेना ५७
राष्ट्रवादी काँग्रेस ४१
उद्धव ठाकरे गट २०
काँग्रेस १६
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस १०
समाजवादी पक्ष २
इतर १०

इतर १० जणांपैकी जनसुराज्य शक्तीचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचा १, राष्ट्रीय समाज पक्षाचा १, राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचा १ अशा पाच सदस्यांनी राज्यातील महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे. तर समाजवादी पक्षाचे २, एमआयएमचा १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा १, शेतकरी कामगार पक्षाचा १ अशा पाच जणांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पाच इतर मिळून २३५ आमदारांची महायुती सत्तेत आहे. तर ५१ आमदार विरोधात आहेत.
Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक जाहीर

पुणे : मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान