आगीची अफवा आणि रेल्वे ट्रॅक बनला मृत्यूचा सापळा

मुंबई: अफवा या आगीप्रमाणे पसरतात. महाराष्ट्रात बुधवारी याच अफवेने अनेकांचे बळी घेतले. लखनऊ येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी चेन पुलिंग करून रेल्वे थांबवली. प्रवाशांनी घाबरून ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याच वेळेस दुसऱ्या दिशेने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली. यात १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना १.५ लाख रूपये आणि गंभीर जखमींना ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे.



लखनऊ येथून पुष्पक एक्सप्रेस वेगात मुंबईच्या दिशेने जात होती. बुधवारी संध्याकाळी ४.४२ची वेळ होती. ट्रेन मुंबईच्या ४२५ किमी आधी जळगावच्या पाचोरा स्थानकाच्या जवळ पोहोचली होती. यावेळेस अचानक पुष्पक एक्सप्रेसच्या बी४ बोगीतून धूर निघताना दिसला. यावेळेस अफवा पसरली की बोगीमध्ये आग लागली. या अफवेमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी लोकांनी इमरजन्सी चेन खेचली आणि ट्रेन थांबवली. यावेळेस प्रवासी रेल्वेतून खाली उतरले मात्र त्याचवेळेस दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले. हा अपघात अंगावर काटे आणणार होता. अनेक मृतदेह इतरस्त्र पसरले होते.


मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला जात असलेली पुष्पक एक्सप्रेस जळगावच्या पाचोरा स्टेशनजवळ पोहोचली होती. पुष्पक एक्सप्रेसच्या बी ४ बोगीमधून धूर निघताना पाहिल्याने लोकांनी आग लागल्याची अफवा पसरवली. यावेळेस चेन खेचण्यात आली. चेन खेचून अनेक प्रवासी पुष्पक एक्सप्रेसमधून उतरून दुसऱ्या ट्रॅकवर उभे राहिले. यावेळेस दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना धडक दिली.


या दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाले. ही रेल्वे दुर्घटना उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरावळ माहेजी आणि परधाडे स्थानकादरम्यान घडला

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस