आगीची अफवा आणि रेल्वे ट्रॅक बनला मृत्यूचा सापळा

  77

मुंबई: अफवा या आगीप्रमाणे पसरतात. महाराष्ट्रात बुधवारी याच अफवेने अनेकांचे बळी घेतले. लखनऊ येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी चेन पुलिंग करून रेल्वे थांबवली. प्रवाशांनी घाबरून ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याच वेळेस दुसऱ्या दिशेने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली. यात १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना १.५ लाख रूपये आणि गंभीर जखमींना ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे.



लखनऊ येथून पुष्पक एक्सप्रेस वेगात मुंबईच्या दिशेने जात होती. बुधवारी संध्याकाळी ४.४२ची वेळ होती. ट्रेन मुंबईच्या ४२५ किमी आधी जळगावच्या पाचोरा स्थानकाच्या जवळ पोहोचली होती. यावेळेस अचानक पुष्पक एक्सप्रेसच्या बी४ बोगीतून धूर निघताना दिसला. यावेळेस अफवा पसरली की बोगीमध्ये आग लागली. या अफवेमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी लोकांनी इमरजन्सी चेन खेचली आणि ट्रेन थांबवली. यावेळेस प्रवासी रेल्वेतून खाली उतरले मात्र त्याचवेळेस दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले. हा अपघात अंगावर काटे आणणार होता. अनेक मृतदेह इतरस्त्र पसरले होते.


मिळालेल्या माहितीनुसार मुंबईला जात असलेली पुष्पक एक्सप्रेस जळगावच्या पाचोरा स्टेशनजवळ पोहोचली होती. पुष्पक एक्सप्रेसच्या बी ४ बोगीमधून धूर निघताना पाहिल्याने लोकांनी आग लागल्याची अफवा पसरवली. यावेळेस चेन खेचण्यात आली. चेन खेचून अनेक प्रवासी पुष्पक एक्सप्रेसमधून उतरून दुसऱ्या ट्रॅकवर उभे राहिले. यावेळेस दुसऱ्या दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने त्यांना धडक दिली.


या दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाले. ही रेल्वे दुर्घटना उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरावळ माहेजी आणि परधाडे स्थानकादरम्यान घडला

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.