IND Vs ENG: शमीला बेंचवर बसवणे, ३ स्पिनर्स खेळवणे...इंग्लंडविरुद्ध भारताचा परफेक्ट प्लान

  75

मुंबई: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर बुधवारी खेळवण्यात आला. यात भारतीय संघाने ७ विकेट राखत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने या सामन्यात काही खास प्लान केला होता. हा प्लान परफेक्ट ठरला.


या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेईंग ११मध्ये निवडण्यात आले नव्हते. सोबतच कर्णधार सूर्याने या सामन्यात तीन स्पिनर्स उतरवले होते. त्याच्या या निर्णयाने सारेच आश्चर्यचकित झाले होते मात्र सामना जिंकल्यानंतर हा निर्णय योग्य ठरला.



अर्शदीपचे यश


सूर्याने सामन्यात शमीला बसवून एकच स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज खेळवला होता. हा अर्शदीप होता. याशिवाय दोन वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीही होे. मात्र अर्शदीपने पहिल्या षटकापासून आपले रंग दाखवायला सुरूवात केली. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मोठे यश मिळवून दिले होते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये संघाला दुसरे यश मिळवून दिले. अर्शदीपने १७ धावांवर इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले.



तीनही स्पिनर्सना उतरवण्याची रणनीती यशस्वी ठरली


कर्णधार सूर्याने या सामन्यात ३ स्पिनर अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरूण चक्रवर्ती यांना खेळवले होते. तीनही की प्लेयर ठरले. वरूणने सर्वाधिक ३ विकेट मिळवले. तर अक्षऱला २ विकेट मिळवण्यात यश आले. रवीला विकेट मिळाला नाही मात्र त्याने धावांवर लगाम ठेवला.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र