IND Vs ENG: शमीला बेंचवर बसवणे, ३ स्पिनर्स खेळवणे...इंग्लंडविरुद्ध भारताचा परफेक्ट प्लान

मुंबई: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर बुधवारी खेळवण्यात आला. यात भारतीय संघाने ७ विकेट राखत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने या सामन्यात काही खास प्लान केला होता. हा प्लान परफेक्ट ठरला.


या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेईंग ११मध्ये निवडण्यात आले नव्हते. सोबतच कर्णधार सूर्याने या सामन्यात तीन स्पिनर्स उतरवले होते. त्याच्या या निर्णयाने सारेच आश्चर्यचकित झाले होते मात्र सामना जिंकल्यानंतर हा निर्णय योग्य ठरला.



अर्शदीपचे यश


सूर्याने सामन्यात शमीला बसवून एकच स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज खेळवला होता. हा अर्शदीप होता. याशिवाय दोन वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीही होे. मात्र अर्शदीपने पहिल्या षटकापासून आपले रंग दाखवायला सुरूवात केली. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मोठे यश मिळवून दिले होते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये संघाला दुसरे यश मिळवून दिले. अर्शदीपने १७ धावांवर इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले.



तीनही स्पिनर्सना उतरवण्याची रणनीती यशस्वी ठरली


कर्णधार सूर्याने या सामन्यात ३ स्पिनर अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरूण चक्रवर्ती यांना खेळवले होते. तीनही की प्लेयर ठरले. वरूणने सर्वाधिक ३ विकेट मिळवले. तर अक्षऱला २ विकेट मिळवण्यात यश आले. रवीला विकेट मिळाला नाही मात्र त्याने धावांवर लगाम ठेवला.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय