IND Vs ENG: शमीला बेंचवर बसवणे, ३ स्पिनर्स खेळवणे...इंग्लंडविरुद्ध भारताचा परफेक्ट प्लान

मुंबई: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर बुधवारी खेळवण्यात आला. यात भारतीय संघाने ७ विकेट राखत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने या सामन्यात काही खास प्लान केला होता. हा प्लान परफेक्ट ठरला.


या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्लेईंग ११मध्ये निवडण्यात आले नव्हते. सोबतच कर्णधार सूर्याने या सामन्यात तीन स्पिनर्स उतरवले होते. त्याच्या या निर्णयाने सारेच आश्चर्यचकित झाले होते मात्र सामना जिंकल्यानंतर हा निर्णय योग्य ठरला.



अर्शदीपचे यश


सूर्याने सामन्यात शमीला बसवून एकच स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज खेळवला होता. हा अर्शदीप होता. याशिवाय दोन वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डीही होे. मात्र अर्शदीपने पहिल्या षटकापासून आपले रंग दाखवायला सुरूवात केली. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये मोठे यश मिळवून दिले होते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये संघाला दुसरे यश मिळवून दिले. अर्शदीपने १७ धावांवर इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले.



तीनही स्पिनर्सना उतरवण्याची रणनीती यशस्वी ठरली


कर्णधार सूर्याने या सामन्यात ३ स्पिनर अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरूण चक्रवर्ती यांना खेळवले होते. तीनही की प्लेयर ठरले. वरूणने सर्वाधिक ३ विकेट मिळवले. तर अक्षऱला २ विकेट मिळवण्यात यश आले. रवीला विकेट मिळाला नाही मात्र त्याने धावांवर लगाम ठेवला.

Comments
Add Comment

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय