Ambernath Accident : मद्यधुंद ट्रेलर चालकाची ५० वाहनांना धडक!

  80

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये डोंबिवली- बदलापूर पाईपलाईन मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. एका मद्यधुंद ट्रेलर चालकाने उलट्या दिशेने गाडी चालवत ५० वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही काही जण जखमी झाले आहेत. (Ambernath Accident)



मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये नेवाळी नाक्याकडून बदलापूरच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर पालेगाव, अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात चुकीच्या बाजूने जात या ट्रेलरने अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये पोलिसांच्या गाडीसह कार, दुचाकी, रिक्षांचा समावेश आहे.


या घटनेनंतर पोलिसांसह इतर नागरिक ट्रेलरचा पाठलाग करु लागले. यादरम्यान, ट्रेलर चालकाने अतिवेगामुळे ट्रेलर चालवला आणि हा ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या. (Ambernath Accident)


Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.