मुंबई - ठाण्यात रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होणार ?

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये (Mumbai Metropolitan Region) रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. राज्याच्या परिवहन विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ सुचवली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मुंबई महानगर क्षेत्रात रिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांवरुन २६ रुपयांवर जाऊन पोहोचेल तर टॅक्सीचे किमान भाडे २८ रुपयांवरुन ३१ रुपयांवर जाऊन पोहोचेल. याआधी रिक्षासाठी २३ आणि टॅक्सीसाठी २८ रुपये एवढे किमान भाडे निश्चित करण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२२ मध्ये झाला होता.



प्रवासी संघटनांचा प्रस्तावीत भाडेवाढीला विरोध आहे तर रिक्षा आणि टॅक्सीच्या चालक - मालक संघटनांनी भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगितले. इंधनाच्या दरात होत असलेली वाढ, वाहनाच्या देखभालीसाठी होणाऱ्या खर्चात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे भाडेवाढ आवश्यक असे रिक्षा आणि टॅक्सीच्या चालक - मालक संघटनांचे म्हणणे आहे. वाढत्या खर्चांचा बोजा वाहन चालक - मालक यांच्यावर पडू नये यासाठी खटुआ समितीने नियमित कालावधीच्या अंतराने परिस्थितीचा आढावा घेऊन माफक दरवाढ करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशीनुसार घेतलेल्या आढाव्यात २ रुपये ६० अशी दरवाढ सुचवण्यात आली आणि व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे म्हणून नंतर तीन रुपये दरवाढीचा प्रस्ताव सादर झाला आहे. यामुळे ही दरवाढ करावी अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सीच्या चालक - मालक संघटनांनी केली आहे. तर दरवाढीपेक्षा आधी उत्तम सेवा द्या आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात मीटरनुसार सेवा द्या अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई महानगर क्षेत्रात जास्तीत जास्त ठिकाणी शेअर रिक्षा स्टँड, शेअर टॅक्सी स्टँड सुरू करावे; अशीही मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.



बेस्ट (Brihanmumbai Electric Supply and Transport - BEST) आणि एनएमएमटी (Navi Mumbai Municipal Transport - NMMT) पाठोपाठ आता टीएमटी (Thane Municipal Transport - TMT) एसी बसच्या भाड्यात कपात करण्याचा विचार करत आहे. सध्या बेस्टच्या साध्या बसचे किमान भाडे पाच रुपये आणि एसी बसचे किमान भाडे सहा रुपये आहे. एनएमएमटीच्या साध्या बसचे किमान भाडे सात रुपये आणि एसी बसचे किमान भाडे दहा रुपये आहे. याउलट टीएमटीच्या साध्या बसचे किमान भाडे दहा रुपये आणि एसी बसचे किमान भाडे वीस रुपये आहे. यामुळे प्रवासी संख्येवर होत असलेला परिणाम कमी व्हावा यासाठी टीएमटी दर कपातीचा विचार करत आहे.
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६