Pune Crime : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! महिलांनो घराबाहेर पडताना रहा सतर्क

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून  गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशातच पुण्यात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरटे महिलांना सॉफ्ट टार्गेट करत असून त्यांना लुबाडत आहेत.



पुण्यात कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. एका ठिकाणी मंगळसूत्र लंपास केलं, तर दुसऱ्या ठिकाणी गळ्यातील चैन हिसकावली आहे. काल सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास कर्वेनगरमध्ये मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका ज्येष्ठ महिलेची गळ्यातील चैन हिसकावली आहे. या घटनेचे सी सी टिव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये नवसह्याद्री सोसायटीतील चंदन पथ येथे सकाळी फिरायला जाणार्‍या ज्येष्ठ महिलेची चैन चोरून नेले. हिसकवताना अर्धा भाग तुटून खाली पडला असता चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून नेल्याचे दिसत आहे.


तर दुसरी घटना कोथरूडमध्ये घडली आहे. कोथरूड भागातील डी पी रस्त्यावर असलेल्या नचिकेत सोसायटी मध्ये ही घटना घडली. एक दाम्पत्य सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शतपावली करून घरी परतत होते. त्यांनी सोसायटीमध्ये प्रवेश केला आणि घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या २ जणांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवली. पतीने त्यांना पकडायचा प्रयत्न केला मात्र दुचाकीवर असल्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. याबाबत पोलिसात त्यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


दरम्यान, चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांना कसलेच भय उरले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत असताना याबाबत पोलिसांकडून काय पावले उचलली जाणार अशी चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे