Atal Setu : अटल सेतूवर लवकरच उपलब्ध होणार 'या' दोन सोयी

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी- वाहनचालकांसाठी अटल सेतूच्या शेवटी जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.


अटल सागरी सेतूवरुन प्रवास करताना वाहनचालक-प्रवाशांसाठी खानपानाची वा इंधनाची सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता आता अटल सेतूच्या नवी मुंबईच्या दिशेला असलेल्या जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप बांधण्यात येणार आहे. या दोन्ही सुविधा खासगी कंपनीच्या माध्यमातून विकसित केल्या जाणार आहे. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ पासून यासाठीच्या प्रक्रिया सुरू आहे. यासाठी एका खासगी कंपनीबरोबर चर्चा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. अटल सेतूच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकांवर जासई येथे फूड प्लाझा आणि पेट्रोल पंप असणार आहे. येत्या काही महिन्यात ही सुविधा कार्यान्वित होणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली.



मुंबई – नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटात पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने २१.८० किमी लांबीचा सागरी सेतू बांधला. हा सेतू जानेवारी २०२४ पासून वाहतूक सेवेत दाखल झाला. या सेतूवरून दिवसाला सरासरी २२ हजार ५०० वाहने धावतात. त्यात ७० टक्के वाहने चारचाकी आहेत.सेतूच्या समुद्रावरील भागावर वाहन थांबवून उतरण्यास परवानगी नाही. या सागरी सेतूमुळे प्रवास अतिजलद झाला आहे. आता अटलसेतूवर खानपानाची वा इंधनाची सुविधा उपलब्ध झाल्यास वाहनचालक-प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ