Jalgaon Train Accident : जळगावात रेल्वे दुर्घटना, १५ प्रवाशांचा मृत्यू

पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या; समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने चिरडल्याने १५ जणांचा मृत्यू

जळगाव : मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये (Pushpak Express) आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने (Bengaluru Express) त्यांना चिरडल्याने सहा ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (Jalgaon Train Accident) जळगाव जिल्ह्यातील परांडा स्थानकाजवळ घडली आहे.


पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे जात असताना अचानक ब्रेक लावल्यामुळे गाडीच्या चाकांमधून धूर आणि ठिणग्या उडाल्या. या दृश्यामुळे काही प्रवाशांना आग लागल्याची शंका वाटली. घाबरून त्यांनी गाडीतून उड्या मारण्यास सुरुवात केली.



याच वेळी समोरून वेगाने येत असलेल्या बंगळुरू एक्स्प्रेसने या प्रवाशांना धडक दिली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.



घटनेचे प्रत्यक्षदर्शी बाबा जाधव यांनी सांगितले की, "परांडा स्थानकाच्या अगोदर पुष्पक एक्स्प्रेसचा ब्रेक लागल्याने घर्षण झाले आणि आगीच्या ठिणग्या उडाल्या. यामुळे गाडीत असलेल्या प्रवाशांमध्ये भीती पसरली. काहींनी घाबरुन गाडीतून उड्या मारल्या आणि दुर्दैवाने बंगळुरू एक्स्प्रेसने त्यांना चिरडले."


घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले.


ब्रेक लावल्यानंतर धूर आणि ठिणग्या


पुष्पक एक्स्प्रेसच्या चाकांमधून उडालेल्या ठिणग्यांमुळे आग लागल्याचा संशय काही प्रवाशांना झाला. घाबरलेल्या प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्याने आणि त्याचवेळी समोरून आलेल्या गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. बंगळुरू एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना जोरदार धडक बसली, यात प्रवाशांचा मृत्यू झाला.


रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.


ही दुर्घटना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उभे करत असून रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक