अभिषेक शर्माची जबरदस्त खेळी, इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ७ विकेटनी दमदार विजय


कोलकाता: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने कमाल केली. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेती पहिला सामना ७ विकेट राखत जिंकला. सामन्यात इंग्लंडने विजयासाठी भारताला १३३ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान १२.५ षटकांतच पूर्ण केले. या विजयाचे हिरो अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह आणि वरूण चक्रवर्ती ठरले.


कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात जबरदस्त झाली. दरम्यान संजू सॅमसनने २० बॉलमध्ये २६ धावा केल्या. तर सूर्य कुमार यादवला खातेही खोलता आले नाही. एकावेळेस भारतीय संघाने ४१ धावांमध्ये २ विकेट गमावल्या होत्या.



तेव्हा अभिषेक शर्माने मोर्चा सांभाळला आणि २१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. या दरम्यान त्याने ६ षटकार आणि ३ चौकार ठोकले. अभिषेकच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १२.५ षटकांतच ७ विकेट राखत सामना जिंकला. या पद्धतीने भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


कोलकातामध्ये झालेल्या टी-२० सामन्यात अभिषेकने ३४ बॉलमध्ये एकूण ७९ धावांची खेळी केली. यात त्याने ८ षटकार आणि ५ चौकार ठोकले. तिलक वर्मा १९ आणि हार्दिक पांड्या २ धावांवर नाबाद राहिले. अभिषेक आणि तिलक यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ४२ बॉलमध्ये ८४ धावांची भागीदारी झाली.

Comments
Add Comment

PM MODI : "भारताची क्रीडा क्षेत्रातील घोडदौड थक्क करणारी"; युवा खेळाडूंना दिले 'ऑलिम्पिक'चे मोठे लक्ष्य

NEW DELHI : भारतीय खेळाडूंची जागतिक स्तरावरील कामगिरी आणि देशातील क्रीडा संस्कृतीचा वाढता विस्तार, यावर पंतप्रधान

FIFA World Cup 2026 : भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! कुठे पाहता येणार सामने, किती आहे सबस्क्रिप्शन फी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कप २०२६ आज (११ जून ) पासून सुरु

ICC ODI Rankings : भारत पुन्हा नंबर वन ! टी-२० आणि एकदिवसीय मध्ये वर्चस्व कायम

मुंबई :आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नुकताच आयसीसी रँकिंग जाहिर केली आहे.यात भारतीय संघाने

फिफा विश्वचषक २०२६: क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगालचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकरणार ?

नवी दिल्ली :  फुटबॉलच्या जगात असे क्वचितच एखादे यश शिल्लक असेल जे क्रिस्टियानो रोनाल्डोने मिळवलेले नाही, पण

Nikhil Choudhary : दिल्लीत जन्मलेल्या निखिल चौधरीची ऑस्ट्रेलिया संघात एन्ट्री !देशाबाहेर खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादित आणखी एका नावाची भर...

मुंबई: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी

FIFA WORLD CUP 2026 : ४८ संघांचा महासंग्राम; कोण उचलणार ट्रॉफी?

फुटबॉलच्या चाहत्यांसाठी अखेर ती घटिका जवळ आली आहे. २०२६ चा फिफा (FIFA) वर्ल्ड कप अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.