अभिषेक शर्माची जबरदस्त खेळी, इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२०मध्ये भारताचा ७ विकेटनी दमदार विजय


कोलकाता: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने कमाल केली. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेती पहिला सामना ७ विकेट राखत जिंकला. सामन्यात इंग्लंडने विजयासाठी भारताला १३३ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान १२.५ षटकांतच पूर्ण केले. या विजयाचे हिरो अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह आणि वरूण चक्रवर्ती ठरले.


कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात जबरदस्त झाली. दरम्यान संजू सॅमसनने २० बॉलमध्ये २६ धावा केल्या. तर सूर्य कुमार यादवला खातेही खोलता आले नाही. एकावेळेस भारतीय संघाने ४१ धावांमध्ये २ विकेट गमावल्या होत्या.



तेव्हा अभिषेक शर्माने मोर्चा सांभाळला आणि २१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. या दरम्यान त्याने ६ षटकार आणि ३ चौकार ठोकले. अभिषेकच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १२.५ षटकांतच ७ विकेट राखत सामना जिंकला. या पद्धतीने भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


कोलकातामध्ये झालेल्या टी-२० सामन्यात अभिषेकने ३४ बॉलमध्ये एकूण ७९ धावांची खेळी केली. यात त्याने ८ षटकार आणि ५ चौकार ठोकले. तिलक वर्मा १९ आणि हार्दिक पांड्या २ धावांवर नाबाद राहिले. अभिषेक आणि तिलक यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ४२ बॉलमध्ये ८४ धावांची भागीदारी झाली.

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच