गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले

  57

मुंबई : कुर्ला येथील अपघातानंतर चर्चांच्या फैरी झडल्या असल्या तरी बेस्टच्या बसेसचे अपघात आटोक्यात आलेले नाहीत. बेस्टच्या भाडेतत्वावरील गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. गोराई आगाराच्या परिसरात मंगळवारी अशाच एका अपघातात एका तरुणाचा जीव गेला. गोराई परिसरात बेस्टच्या बसचा या महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.


बेस्टच्या भाडेतत्वावरील गाडीला कुर्ला येथे झालेल्या भीषण अपघातानंतर बेस्टच्या अपघातांच्या अनेक घटना बाहेर येऊ लागल्या आहेत. गोराई परिसरातही बेस्टच्या भाडेतत्वावरील बसने अपघात केल्याच्या तीन घटना या महिन्यात घडल्या आहेत. त्यातच मंगळवारी २१ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका तरुणाने जीव गमावल्यामुळे या अपघातांचे गांभीर्य वाढले आहे. मंगळवारी झालेल्या अपघातात बसच्या चाकाखाली आल्यामुळे याच परिसरात राहणाऱ्या वैभव कांबळे याचा मृत्यू ओढवला.



गोराई बसआगाराच्या लगत आकाशवाणी जवळ एल टी मार्ग येथे मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. यावेळी दुचाकीला बेस्टच्या बसगाडीची धडक लागल्यामुळे अपघात झाला आणि दुचाकीस्वार बसच्या मागील चाकात येऊन त्याचा अपघात झाला. वैभव हा याच परिसरातील नंदनवन इमारतीत राहत होता. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे त्यांच्या कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना