Maharashtra Weather Update : राज्यात येत्या २४ तासात हवामान बदलाची शक्यता!

Share

मुंबई : गेले काही दिवस राज्यात थंडावा असलातरी हवामानाचा लपंडाव सुरूच आहे. पहाटे गारवा आणि दिवसभर उकाडा या हवामानाच्या बदलामुळे नागरिकही चिंतेत आहेत. राज्याच्या तापमानात हलका बदल होत असून श्रिलंका आणि तमिळनाडू समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे. यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान,हवामान विभागाने आता महाराष्ट्रात तापमान वाढणार असल्याचं सांगितल आहे.

हवामान विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार सध्या चक्राकार वारे राजस्थान आणि परिसरात सक्रीय आहेत. दक्षिणेकडील राज्यात सध्या तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. याचा परिणाम राज्याच्या तापमानावर होत असून गेल्या काही दिवसात होणारा तापमानातल्या बदलामागे हे कारण आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात येत्या २४ तासांत पुढील तीन दिवसांसाठी तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितल आहे. महाराष्ट्रात येत्या ३ दिवसात किमान तापमानात वाढ होणार असून २ ते ३ अंशांनी राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान वाढेल. त्यानंतर पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा उतरलेला होता. अनेक भागात तापमान १० अंशांच्या खाली नोंदवले जात हेाते. तापमानाच्या चढउताराने सध्या नागरिक सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाने हैराण आहेत. अशातच कोकण, मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. आता गारठा कमी होणार असून २-३ अंशांनी तापमानात वाढ होऊन नागरिकांना उष्णतेला सामोर जावं लागणार आहे.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

24 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

1 hour ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

5 hours ago