Maharashtra Weather Update : राज्यात येत्या २४ तासात हवामान बदलाची शक्यता!

मुंबई : गेले काही दिवस राज्यात थंडावा असलातरी हवामानाचा लपंडाव सुरूच आहे. पहाटे गारवा आणि दिवसभर उकाडा या हवामानाच्या बदलामुळे नागरिकही चिंतेत आहेत. राज्याच्या तापमानात हलका बदल होत असून श्रिलंका आणि तमिळनाडू समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे. यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान,हवामान विभागाने आता महाराष्ट्रात तापमान वाढणार असल्याचं सांगितल आहे.


हवामान विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार सध्या चक्राकार वारे राजस्थान आणि परिसरात सक्रीय आहेत. दक्षिणेकडील राज्यात सध्या तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. याचा परिणाम राज्याच्या तापमानावर होत असून गेल्या काही दिवसात होणारा तापमानातल्या बदलामागे हे कारण आहे.



हवामान विभागाचा अंदाज काय?


राज्यात येत्या २४ तासांत पुढील तीन दिवसांसाठी तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितल आहे. महाराष्ट्रात येत्या ३ दिवसात किमान तापमानात वाढ होणार असून २ ते ३ अंशांनी राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान वाढेल. त्यानंतर पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा उतरलेला होता. अनेक भागात तापमान १० अंशांच्या खाली नोंदवले जात हेाते. तापमानाच्या चढउताराने सध्या नागरिक सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाने हैराण आहेत. अशातच कोकण, मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. आता गारठा कमी होणार असून २-३ अंशांनी तापमानात वाढ होऊन नागरिकांना उष्णतेला सामोर जावं लागणार आहे.

Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५