Mumbai Water Cut : पवईत पाणी गळती; 'या' ४ विभागात पाणी पुरवठा बंद!

  128

मुंबई : तानसा पश्चिम जलवाहिनीवर पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याचे आज पहाटे आढळून आले. यामुळे जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे.


गळती दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने हाती घेण्यात आले असून, या कामासाठी २४ तासांचा कालावधी लागणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.



दुरुस्तीच्या काळात पवई ते धारावी दरम्यान जलवाहिनी बंद राहणार आहे. परिणामी, एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्तर विभाग आणि एच पूर्व या ४ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल.


पालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. जलवाहिनीचे दुरुस्ती काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.