Mahakumbh : महाकुंभात नऊ कोटी भाविकांनी केले स्नान; अमित शहा २७ जानेवारी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड १ फेब्रुवारी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावणार

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे गंगा- यमुना या दृश्य व सरस्वती या अदृश्य नद्यांच्या संगमावर आयोजित महाकुंभ मेळाव्यात (Mahakumbh) देश-विदेशातून लाखो भाविक हजेरी लावत आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांचा आकडा हा दररोज वाढताना दिसून येत आहे. आज १५.९७ लाखांहून अधिक भाविकांनी आणि आतापर्यंत ८.८१ कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.


कोट्यवधी भाविकांना पवित्र स्नानाचे पुण्य देणारा महाकुंभ मेळा सोमवार १३ जानेवारी रोजी सुरु झाला आहे. जवळपास चाळीस कोटीहून अधिक भाविक या महाकुंभमेळ्यास हजेरी लावतील असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.



पंतप्रधान फेब्रुवारीत महाकुंभाला भेट देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाकुंभमेळ्याला भेट देण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २७ जानेवारी रोजी तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड १ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्याला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १० फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्याला हजेरी लावणार आहेत.


Comments
Add Comment

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या

छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी ईडीचे छापे

रायपूर : भारतमाला प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात झालेल्या अनियमिततांच्या

सुप्रीम कोर्टाची अरावली प्रकरणात स्वतःच्या निर्णयालाच स्थगिती

नवी दिल्ली : अरावली खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात पर्वतरांगांच्या नवीन व्याख्येवर