Nashik Update : पतंग उडवणं ८ वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतलं!

नाशिक : पतंग उडवताना तोल गेल्याने ८ वर्षीय चिमुकल्याचा गच्चीरून कोसळून जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या गणेशनगरमध्ये काठी येथे घडली आहे. नक्ष संदीप बनकर असं मृत मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीत शिकत होता. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



नवीन वर्षातील पहिल्या महिन्यातला पहिलावहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांत म्हटलं तीळगूळ, तिळाचे लाडू, आणि पतंग उडवण्याची चढाओढ हे सगळं सादरसंगीत होतच मात्र अनेकदा आवाहन करूनही पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरला जातो. यावर्षी याच नायलॉन मांजाने अनेकांची घर उध्वस्त केली आहेत. अशातच आता नाशिकच्या गणेशनगरमध्ये काठी येथे नक्ष संदीप बनकर ( वय ८ ) गच्चीवर बेभान होऊन पतंग उडवत असताना तोल गेल्याने गच्चीवरून कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. ही काल (दि २०) दुपारच्या सुमारास घडली असून नक्षच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Preet Singh : मुंबईत 'या' अभिनेत्रीला जबर मारहाण; डोळे सुजले, दात पाडले

मुंबई : मुंबईत एका अभिनेत्रीला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या अभिनेत्रोचे डोळे सुजले तसेच दात पडले असून

Navi Mumbai Mahapalika : महापालिका शाळेतील मुलींना ‘गुड टच, बॅड टच‘ तसेच सेल्फ डिफेन्सचे शिक्षणं द्यावे

युवा सेनेचे जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : महापालिका शाळेतील मुलींना

Nashik : नाशिकमधील वृक्षतोडीला ‘हरित लवादा’ची तूर्तास स्थगिती, पुढील सुनावणी 'या' तारखेला होणार

नाशिक : नाशिककरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे कारण शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी