Sagrika Ghatge : अभिनेत्री सागरिका घाटगेचं तब्बल ५ वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक

  73

मुंबई : मराठी आणो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री लग्नानंतर मोठ्या आणि छोट्या पडद्यावरून दूर जातात. त्यानंतर काही अभिनेत्री कमबॅक करतात.अशीच लग्नानंतर करिअरपासून दुरावलेली लोकप्रिय अभिनेत्री सागरिका घाटगे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.





राज घराण्यातुन आलेल्या सागरिकाने भारतीय क्रिकेटपटूसोबत लग्न केलं होतं. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सागरिका ५ वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ती 'ललाट' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाच्या सेटवरील फोटो सागरिकाने शेअर केलेत.सागरिका घाटगे या लूकमध्ये ओळखूच येत नाहीये. सागरिकाने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केलाय. या फोटोंमध्ये ती बंजारा समाजाच्या महिलांच्या लूकमध्ये दिसत आहे.



सागरिका घाटगे क्रिकेटपटू जहीर खानची पत्नी आहे. दोघांनी काही वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. सागरिकाने 'चक दे' या चित्रपटात लक्षवेधी भूमिका केली होती. त्यानंतर ती अतुल कुलकर्णी यांच्यासोबत 'प्रेमाची गोष्ट' या चित्रपटात दिसली होती. सागरिका घाटगे २०२० मध्ये 'फूटपायरी' या सिनेमात शेवटची दिसली होती. त्यानंतर पाच वर्षांनी ती आता ललाट सिनेमात दिसणार आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल