Mumbai Traffic : बीकेसीमधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर!

'या' मार्गावर बदल


मुंबई : वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून नव्या उपाययोजना काढण्यात येतात. त्याचप्रमाणे वांद्रे येथील बीकेसी परिसरात वाहतूक कोंडी होण्याच्या वाढत्या तक्रारी पाहता वाहतूक पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. बीकेसीमधील वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) रोखण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.



उपायुक्त (मुख्यालय) समाधान पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, बीकेसी परिसरात वाहनांची वर्दळ वाढल्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. त्याअंतर्गत अव्हेन्यु-३ मार्गावरील वाहनांना वी वर्क गॅप ते कनेक्टर जंक्शन व कनेक्टर जंक्शन ते एनएसई जंक्शनपर्यंत जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आजपासून ही प्रवेश बंदी सुरु केली असून २० एप्रिलपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.


वाहनधारक व नागरिकांची गैरसोय न होण्यासाठी प्रवेश बंद मार्गावरील वाहतूक इतर मार्गावर वळवण्यात आली आहे. अव्हेन्यु-३ मार्गावर जाणारी वाहने अव्हेन्यु-३ मार्ग- वी वर्क गॅप डावे वळण – वी वर्क बिल्डींग मागील बाजू उजवे वळण- कनेक्टर ब्रिज खालून एमएमआरडीए मैदान ( फटाका मैदान) – एनएसई जंक्शन येथून इच्छित स्थळी जातील. (Mumbai Traffic)

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पूजेत विरोधही होणार मवाळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा