Neeraj Chopra: गुपचूप लग्नबंधनात अडकला भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा, फोटो शेअर करत दिली माहिती

मुंबई: भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा लग्नबंधनात अडकला आहे. नीरजने रविवारी रात्री सोशल मीडियावर फोटो शेअऱ करत याची माहिती दिली. नीरजच्या लग्नात त्याचे जवळचे नातेवाईक तसेच मित्रमंडळी उपस्थित होते. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नीरजने आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर केले आहेत.


नीरजने लग्नाचे फोटो एक्सवर शेअर केलेत. यात त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरूवात आपल्या कुटुंबासोबत केलीये. नीरजच्या लग्नात केवळ जवळच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. त्याने कॅप्शनच्या मआध्यमातून आपल्या बायकोचे नावही सांगितले आहे. तिचे नाव हिमानी आहे. ती काय करते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.






नीरजच्या लग्नाची सुरू होती चर्चा


नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्याचा हा विजय ऐतिहासिक होता. यानंतर नीरजच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. नीरजला अनेक मुलाखतींमध्ये लग्नाबाबतचे सवाल केले जात असत. मात्र त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच त्याने होणाऱ्या जोडीदाराबद्दलही खुलासा केला नव्हता. आता गुपचूप लग्न केले आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि