वानखेडे स्टेडियमची पन्नाशी!

मुंबई (मानसी खांबे) : वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचं ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होते. वानखेडे स्टेडियमच्या आधी मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया)च्या अंतर्गत असलेल्या या स्टेडियमवर खेळले जायचे. त्यानुसार १९७२ साली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि क्रिकेटप्रेमी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी या मैदानात सामना खेळवण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी सीसीआयचे अध्यक्ष ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चंट यांनी वानखेडे यांची सामना खेळवण्याची मागणी फेटाळून लावली. यावेळी शब्दाला शब्द लागून वातावरणही गरम झाले होते. दरम्यान एका मराठी माणसाच्या केलेला अपमानामुळे या वागणुकीचा बदला घेण्यासाठी ५० वर्षापूर्वी मुंबईतील चर्चगेट येथे अवघ्या १३ महिन्यात वानखेडे स्टेडियम उभारण्यात आले.


क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला आज १९ जानेवारी रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटचा देवता म्हणजेच सचिन तेंडुलकर यासह मुंबई क्रिकेट संघाचे तसेच भारतीय क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. तसेच अजय-अतुल आणि अवधुत गुप्ते यांचा गाण्यांचा कार्यक्रम देखील होत आहे.


मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमादरम्यान मुंबईचे खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पुष्पगुच्छ आणि वानखेडे स्टेडियमची प्रतिकृती खेळाडूंना देण्यात आली. सर्वप्रथम सुनील गावस्कर, त्यानंतर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, डायना इडुलजी यांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमादरम्यान स्टेजवर सचिन तेंडुलकर याने स्टेडियम वरील काही आठवणी सांगितल्या. मैदानातील पहिला दिवस ते निवृत्ती दिवसापर्यंतच्या सर्व आठवणी सचिनने जागवल्या. तसेच मैदानात मित्रांसोबत केलेली धमालमस्तीही सांगितली. यावेळी चाहत्यांकडून केल्या जाणाऱ्या 'सचिन- सचिन'च्या घोषणांनी संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेले.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध