मुंबई :अभिनेता आर माधवन आणि कंगना राणावत यांची मुख्य भूमिका असलेला ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाचे दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. चित्रपटाच्या या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता लवकरच ‘तनू वेड्स मनू’चा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आर माधवन याने या चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधलं आहे.
अभिनेता आर माधवनला एका मुलाखतीत तनू वेड्स मनू संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, “मला याबद्दल कोणतीही कल्पना नाही. इन्स्टाग्रामवर सुद्धा यासंदर्भात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर मला लोक प्रश्न विचारत आहेत. पण, अद्यापही मला आनंद एल राय किंवा इतर कोणीही ‘तनू वेड्स मनू’ च्या तिसऱ्या पार्ट संदर्भात विचारणा केलेली नाही.”
पुढे अभिनेता म्हणाला, “मला काहीच माहिती नाही शिवाय स्क्रीप्ट सुद्धा मला दिलेली नाही. कदाचित मला रिप्लेस करण्यात आलं असेल.” अभिनेता आर माधवनच्या या वक्तव्यानंतर हे नक्की झाले आहे की तो तनु वेड्स मनू चित्रपटाचा भाग नसणार आहे. त्यामुळे आता माधवन च्या जागेवर कोणता अभिनेता दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही. पण माधवनला खरंच रिप्लेस केले असेल तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असेल.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…