अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही, हत्या; मारेकरी पोलिसांना होणार शिक्षा

मुंबई : बदलापूरच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेची हत्या झाली. पोलिसांनी एन्काउंटरचा बनाव रचून आरोपी अक्षय शिंदेची हत्या केली; असा अहवाल ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे दोषी असलेल्या पाच पोलिसांविरोधात आरोपीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.



अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. फॉरेन्सिकचा या संदर्भातला अहवाल आल्यानंतर ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.



अक्षय शिंदे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याची कच्चा कैदी म्हणून तळोजा कारागृहात रवानगी झाली होती. पण एका चौकशीसाठी पोलिसांना अक्षयचा पुन्हा ताबा हवा होता. पोलिसांनी कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करुन परवानगी घेतली. यानंतर पोलिसांनी कारागृहातून अक्षयला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथक तपासाच्या कामासाठी एका ठिकाणाच्या दिशेने निघाले. या प्रवासादरम्यान संधी साधून अक्षयने एका पोलिसाचे शस्त्र ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षात स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला हा दावाच संशयास्पद आहे, असे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल देताना आधार म्हणून त्यांनी फॉरेन्सिकचा अहवाल सोबत जोडला आहे. अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, असे फॉरेन्सिकचा अहवाल सांगतो. यामुळे न्यायदंडाधिकारी यांनी पोलिसांच्या दाव्याविषयी शंका उपस्थित केली. न्यायदंडाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल आणि फॉरेन्सिकचा अहवाल यांची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयात न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीला गोखले यांनी पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले.
Comments
Add Comment

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०