मुंबई : राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीच्या स्पर्धेत महायुतीने बाजी मारली. ...
अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. फॉरेन्सिकचा या संदर्भातला अहवाल आल्यानंतर ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई : नुकतेच राज्य सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. यामध्ये बीडचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. ...
अक्षय शिंदे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याची कच्चा कैदी म्हणून तळोजा कारागृहात रवानगी झाली होती. पण एका चौकशीसाठी पोलिसांना अक्षयचा पुन्हा ताबा हवा होता. पोलिसांनी कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करुन परवानगी घेतली. यानंतर पोलिसांनी कारागृहातून अक्षयला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथक तपासाच्या कामासाठी एका ठिकाणाच्या दिशेने निघाले. या प्रवासादरम्यान संधी साधून अक्षयने एका पोलिसाचे शस्त्र ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षात स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला हा दावाच संशयास्पद आहे, असे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल देताना आधार म्हणून त्यांनी फॉरेन्सिकचा अहवाल सोबत जोडला आहे. अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, असे फॉरेन्सिकचा अहवाल सांगतो. यामुळे न्यायदंडाधिकारी यांनी पोलिसांच्या दाव्याविषयी शंका उपस्थित केली. न्यायदंडाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल आणि फॉरेन्सिकचा अहवाल यांची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयात न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीला गोखले यांनी पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले.