अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही, हत्या; मारेकरी पोलिसांना होणार शिक्षा

मुंबई : बदलापूरच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेची हत्या झाली. पोलिसांनी एन्काउंटरचा बनाव रचून आरोपी अक्षय शिंदेची हत्या केली; असा अहवाल ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे दोषी असलेल्या पाच पोलिसांविरोधात आरोपीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.



अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. फॉरेन्सिकचा या संदर्भातला अहवाल आल्यानंतर ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.



अक्षय शिंदे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याची कच्चा कैदी म्हणून तळोजा कारागृहात रवानगी झाली होती. पण एका चौकशीसाठी पोलिसांना अक्षयचा पुन्हा ताबा हवा होता. पोलिसांनी कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करुन परवानगी घेतली. यानंतर पोलिसांनी कारागृहातून अक्षयला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथक तपासाच्या कामासाठी एका ठिकाणाच्या दिशेने निघाले. या प्रवासादरम्यान संधी साधून अक्षयने एका पोलिसाचे शस्त्र ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षात स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला हा दावाच संशयास्पद आहे, असे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल देताना आधार म्हणून त्यांनी फॉरेन्सिकचा अहवाल सोबत जोडला आहे. अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, असे फॉरेन्सिकचा अहवाल सांगतो. यामुळे न्यायदंडाधिकारी यांनी पोलिसांच्या दाव्याविषयी शंका उपस्थित केली. न्यायदंडाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल आणि फॉरेन्सिकचा अहवाल यांची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयात न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीला गोखले यांनी पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले.
Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना, आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ