अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही, हत्या; मारेकरी पोलिसांना होणार शिक्षा

मुंबई : बदलापूरच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेची हत्या झाली. पोलिसांनी एन्काउंटरचा बनाव रचून आरोपी अक्षय शिंदेची हत्या केली; असा अहवाल ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे दोषी असलेल्या पाच पोलिसांविरोधात आरोपीच्या हत्येप्रकरणी कायदेशीर कारवाईचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.



अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. फॉरेन्सिकचा या संदर्भातला अहवाल आल्यानंतर ठाणे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. या अहवालाआधारे मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.



अक्षय शिंदे याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याची कच्चा कैदी म्हणून तळोजा कारागृहात रवानगी झाली होती. पण एका चौकशीसाठी पोलिसांना अक्षयचा पुन्हा ताबा हवा होता. पोलिसांनी कायद्यानुसार न्यायालयात अर्ज करुन परवानगी घेतली. यानंतर पोलिसांनी कारागृहातून अक्षयला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अक्षयला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथक तपासाच्या कामासाठी एका ठिकाणाच्या दिशेने निघाले. या प्रवासादरम्यान संधी साधून अक्षयने एका पोलिसाचे शस्त्र ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रत्यक्षात स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला हा दावाच संशयास्पद आहे, असे न्यायदंडाधिकारी यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल देताना आधार म्हणून त्यांनी फॉरेन्सिकचा अहवाल सोबत जोडला आहे. अक्षयने जे शस्त्र वापरल्याचे पोलिसांनी सांगितले त्या शस्त्रावर त्याच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत, असे फॉरेन्सिकचा अहवाल सांगतो. यामुळे न्यायदंडाधिकारी यांनी पोलिसांच्या दाव्याविषयी शंका उपस्थित केली. न्यायदंडाधिकारी यांनी सादर केलेला अहवाल आणि फॉरेन्सिकचा अहवाल यांची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयात न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीला गोखले यांनी पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले.
Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,