Elephants on Winter Vacation : महाराष्ट्रात हत्तींना हिवाळी सुट्टी!

गडचिरोली : मेळघाट किंवा गडचिरोली येथे पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील हत्तींना पुढील काही दिवस हिवाळी सुट्टीवर पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे याकाळात गडचिरोली येथे हत्ती पहायला जाणाऱ्यांना हत्ती न दिसण्याचा अंदाज दिला जात आहे. (Elephants on Winter Vacation)



गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील सरकारी 'हत्ती छावणी' मध्ये सध्या नऊ हत्ती कार्यरत आहेत. बसंती, रूपा, अजित, मंगला, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी, कुसुम. तथापि, या नऊ हत्तींना २० जानेवारी ते २९ जानेवारी पर्यंत रजेवर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे 'हत्ती छावणी' दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. तर दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोळकास येथील हत्तींना १० जानेवारी ते २५ जानेवारी अशा १५ दिवसांच्या वैद्यकीय सुट्टीवर पाठवण्यात आले असून या काळात हत्ती सफारी बंद असणार आहे.



हत्तींच्या हिवाळी सुट्टीमागचे कारण काय?


हत्तींसाठी हा वार्षिक विशेष वैद्यकीय रजेचा काल असतो. जानेवारीच्या थंडीत त्यांच्या पायांना भेगा पडू नये यासाठी त्यांच्या पायांवर विशेष उपचार केले जाते. ज्याला चोपिंग असे म्हणतात. चोपिंगमध्ये हत्तींच्या पायांना ४० ते ४५ औषधी वनस्पतींचं मिश्रण लावण्यात येतं. दहा दिवस हत्ती डॉक्टरांच्या देखरेखी खाली असतात. त्यांच्या पायांना अधिकाधिक विश्रांती मिळावी असा उद्देश असल्याने त्यांना फारशी हालचाल करू दिलं जात नाही. शिवाय त्यांना कुठलंही काम करू दिलं जात नाही. याशिवाय, त्यांच्या प्रकृती संदर्भातील तपासणी, रक्त चाचणी वगैरे केल्या जातात. (Elephants on Winter Vacation)

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु