Elephants on Winter Vacation : महाराष्ट्रात हत्तींना हिवाळी सुट्टी!

गडचिरोली : मेळघाट किंवा गडचिरोली येथे पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील हत्तींना पुढील काही दिवस हिवाळी सुट्टीवर पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे याकाळात गडचिरोली येथे हत्ती पहायला जाणाऱ्यांना हत्ती न दिसण्याचा अंदाज दिला जात आहे. (Elephants on Winter Vacation)



गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील सरकारी 'हत्ती छावणी' मध्ये सध्या नऊ हत्ती कार्यरत आहेत. बसंती, रूपा, अजित, मंगला, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी, कुसुम. तथापि, या नऊ हत्तींना २० जानेवारी ते २९ जानेवारी पर्यंत रजेवर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे 'हत्ती छावणी' दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. तर दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोळकास येथील हत्तींना १० जानेवारी ते २५ जानेवारी अशा १५ दिवसांच्या वैद्यकीय सुट्टीवर पाठवण्यात आले असून या काळात हत्ती सफारी बंद असणार आहे.



हत्तींच्या हिवाळी सुट्टीमागचे कारण काय?


हत्तींसाठी हा वार्षिक विशेष वैद्यकीय रजेचा काल असतो. जानेवारीच्या थंडीत त्यांच्या पायांना भेगा पडू नये यासाठी त्यांच्या पायांवर विशेष उपचार केले जाते. ज्याला चोपिंग असे म्हणतात. चोपिंगमध्ये हत्तींच्या पायांना ४० ते ४५ औषधी वनस्पतींचं मिश्रण लावण्यात येतं. दहा दिवस हत्ती डॉक्टरांच्या देखरेखी खाली असतात. त्यांच्या पायांना अधिकाधिक विश्रांती मिळावी असा उद्देश असल्याने त्यांना फारशी हालचाल करू दिलं जात नाही. शिवाय त्यांना कुठलंही काम करू दिलं जात नाही. याशिवाय, त्यांच्या प्रकृती संदर्भातील तपासणी, रक्त चाचणी वगैरे केल्या जातात. (Elephants on Winter Vacation)

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद