Suicide: पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

नाशिक : प्रेमविवाह केलेल्या पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून पतीने व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या(Suicide) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मनोहर नथू गवांदे (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) यांचा मुलगा प्रीतम नथू गवांदे व आरोपी भारती गवांदे (वय ३२, दोघेही रा. पाथर्डी फाटा) यांनी प्रेमविवाह केला होता. दरम्यान, लग्नानंतर कोरोनाच्या साथीमुळे प्रीतम आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे आरोपी पत्नीने "मी तुझ्याशी प्रेम करून फसले. तू भिकारी आहेस. मला घटस्फोट दे," असे म्हणून पती प्रीतम याला वडिलांकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली; मात्र त्यास प्रीतमने नकार दिला असता आरोपी पत्नीने त्याच्याशी वेळोवेळी भांडण करून वाद घातला. त्यानंतर पत्नीला परपुरुषाबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने त्याचा संताप झाला.

प्रीतमला पत्नीने शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. प्रीतमने दि. १२ ऑगस्ट रोजी व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मयत प्रीतमचे वडील मनोहर गवांदे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पती प्रीतम याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी भारती गवांदेविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

निवडणूक रणधुमाळीमध्ये बुलढाण्यात गोंधळ; बोगस मतदाराला नागरिकांकडून चोप

बुलढाणा : राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार

Maharashtra Nagar Parishad Election : मतदान केंद्रांवर गर्दी! महाराष्ट्रात मतदानाच्या टक्केवारीत सकारात्मक वाढ; आतापर्यंत आकडे काय सांगतात?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडत आहे. या

Nagarparishad Election Result : उद्याची मतमोजणी रद्द! उच्च न्यायालयाच्या आदेशाने निकालाची तारीख ढकलली पुढे, निकाल आता 'या' दिवशी लागणार!

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक अत्यंत

Satara Accident : काळाचा घाला! कराडजवळ नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल बस २० फूट दरीत कोसळली; ५ जणांची प्रकृती गंभीर, २० जखमी!

सातारा : पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळच्या कराड परिसरात सोमवारी सकाळी एक मोठी आणि हृदयद्रावक दुर्घटना

निवडणुक अपडेट: राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मात्र निकाल कधी लागणार?

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. नगर

निवडणुकीतील स्थगितीने सर्वच पक्ष नाराज

कायदेशीर सल्ला घेऊन निवडणुका पुढे ढकलल्या : राज्य निवडणूक आयोग आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला :