Suicide: पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

  84

नाशिक : प्रेमविवाह केलेल्या पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून पतीने व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या(Suicide) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मनोहर नथू गवांदे (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) यांचा मुलगा प्रीतम नथू गवांदे व आरोपी भारती गवांदे (वय ३२, दोघेही रा. पाथर्डी फाटा) यांनी प्रेमविवाह केला होता. दरम्यान, लग्नानंतर कोरोनाच्या साथीमुळे प्रीतम आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे आरोपी पत्नीने "मी तुझ्याशी प्रेम करून फसले. तू भिकारी आहेस. मला घटस्फोट दे," असे म्हणून पती प्रीतम याला वडिलांकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली; मात्र त्यास प्रीतमने नकार दिला असता आरोपी पत्नीने त्याच्याशी वेळोवेळी भांडण करून वाद घातला. त्यानंतर पत्नीला परपुरुषाबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने त्याचा संताप झाला.

प्रीतमला पत्नीने शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. प्रीतमने दि. १२ ऑगस्ट रोजी व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मयत प्रीतमचे वडील मनोहर गवांदे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पती प्रीतम याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी भारती गवांदेविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत