Kho Kho World cup 2025: भारताच्या पोरी हुश्शार...भारतीय महिला संघाने जिंकला खो खो विश्वचषक २०२५

नवी दिल्ली: खो खो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय महिला संघाने नेपाळला ७८-४० असे हरवत वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब आपल्या नावे केला आहे. सुरूवातीपासूनच भारताच्या मुलींनी कमालीचे प्रदर्शन केले. फायनल सामन्यात त्यांनी नेपाळला गुडघे टेकायला भाग पाडले आणि भारताचा झेंडा गर्वाने फडकवला. प्रियंगा इंगळेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या खेळात इतिहास रचला आहे.



भारताचे जबरदस्त आक्रमण


भारतीय महिला संघ आणि नेपाळच्या संघामध्ये खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्याच्या स्कोरकार्डवर एक नजर टाकल्यास सुरूवातीपासूनच टीम इंडियाचे आक्रमण जबरदस्त होते. नेपाळच्या कर्णधाराने टॉस जिंकत पहिल्यांदा बचावात्मक भूमिका ङेतली. मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. पहिल्या टर्नममध्ये भारताच्या खेळाडूंनी नेपाळच्या बचावात्मक भूमिकेला हाणून पाडत ३४ गुण मिळवले. भारतीय संघाने नेपाळच्या ६ बॅच बाद केल्या.



दुसऱ्या टर्नमध्ये बचाव करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे नेपाळला चांगलेच दमवले. भारतानेही दुसऱ्या टर्नमध्ये बचावातून ड्रीम रनच्या मदतीने १ गुण मिळवला. तर नेपाळच्या आक्रमणाने २२ गुण मिळवले. तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमण करताना कमाल केली. त्यांनी नेपाळला सामन्यातूनच बाहेर केले आणि ३८ गुण मिळवले. नेपाळला यावेळी बचाव करताना एकही गुण मिळाला नाही.



नेपाळला संधी नाहीच


अखेरच्या सामन्यातही टीम इंडियाने तेच केले जे त्यांनी पहिल्या सामन्यापासून केले. संपूर्ण सामन्यादरम्यान त्यांनी नेपाळला पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि विश्वजेता बनले. त्यांनी सलग ६ सामने जिंकत खोखो विश्वचषक २०२५ची ट्रॉफी उचलली.


Comments
Add Comment

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला