Kho Kho World cup 2025: भारताच्या पोरी हुश्शार...भारतीय महिला संघाने जिंकला खो खो विश्वचषक २०२५

नवी दिल्ली: खो खो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय महिला संघाने नेपाळला ७८-४० असे हरवत वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब आपल्या नावे केला आहे. सुरूवातीपासूनच भारताच्या मुलींनी कमालीचे प्रदर्शन केले. फायनल सामन्यात त्यांनी नेपाळला गुडघे टेकायला भाग पाडले आणि भारताचा झेंडा गर्वाने फडकवला. प्रियंगा इंगळेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या खेळात इतिहास रचला आहे.



भारताचे जबरदस्त आक्रमण


भारतीय महिला संघ आणि नेपाळच्या संघामध्ये खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्याच्या स्कोरकार्डवर एक नजर टाकल्यास सुरूवातीपासूनच टीम इंडियाचे आक्रमण जबरदस्त होते. नेपाळच्या कर्णधाराने टॉस जिंकत पहिल्यांदा बचावात्मक भूमिका ङेतली. मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. पहिल्या टर्नममध्ये भारताच्या खेळाडूंनी नेपाळच्या बचावात्मक भूमिकेला हाणून पाडत ३४ गुण मिळवले. भारतीय संघाने नेपाळच्या ६ बॅच बाद केल्या.



दुसऱ्या टर्नमध्ये बचाव करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे नेपाळला चांगलेच दमवले. भारतानेही दुसऱ्या टर्नमध्ये बचावातून ड्रीम रनच्या मदतीने १ गुण मिळवला. तर नेपाळच्या आक्रमणाने २२ गुण मिळवले. तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमण करताना कमाल केली. त्यांनी नेपाळला सामन्यातूनच बाहेर केले आणि ३८ गुण मिळवले. नेपाळला यावेळी बचाव करताना एकही गुण मिळाला नाही.



नेपाळला संधी नाहीच


अखेरच्या सामन्यातही टीम इंडियाने तेच केले जे त्यांनी पहिल्या सामन्यापासून केले. संपूर्ण सामन्यादरम्यान त्यांनी नेपाळला पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि विश्वजेता बनले. त्यांनी सलग ६ सामने जिंकत खोखो विश्वचषक २०२५ची ट्रॉफी उचलली.


Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे