नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर (Manu Bhaker) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही स्कूटीवरुन जात असताना अचानक एका गाडीने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनू भाकरचे मामा युद्धवीर सिंग हे रोडवेजमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यांचे महेंद्रगड बायपासवर घर आहे. ते आज नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले. त्याच वेळी मनूची आजी सावित्री देवी यांना त्यांच्या लहान मुलाच्या घरी लोहारु चौकात जायचे होते. त्यामुळे युद्धवीर यांनी त्यांच्या आईला दुचाकीवर बसण्यास सांगितले आणि ते एकत्र निघाले. मनू भाकरचे मामा हे दुचाकी चालवत कालियाना वळणाजवळ आले. त्याचवेळी समोरुन भरधाव वेगात कार येताना दिसली. हा कार उलट दिशेने येत होती आणि तिचा वेग प्रचंड होता. यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानतंर ती कार थेट मनू भाकर यांच्या दुचाकीला जाऊन आदळली.
यावेळी युद्धवीर सिंग आणि सावित्री देवी हे रस्त्यावर पडून जखमी झाले. तर भरधाव वेगात येणारी कार ही रस्त्याच्या कडेला उलटी झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मनू भाकरचे मामा आणि आजीचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून आरोपींचा शोध घेत आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…