Manu Bhaker : खेलरत्न विजेत्या मनू भाकरच्या आनंदावर विरजण; नातलगांचा अपघाती मृत्यू!

नवी दिल्ली : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर (Manu Bhaker) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही स्कूटीवरुन जात असताना अचानक एका गाडीने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मनू भाकरचे मामा युद्धवीर सिंग हे रोडवेजमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यांचे महेंद्रगड बायपासवर घर आहे. ते आज नेहमीप्रमाणे सकाळी कामासाठी घराबाहेर पडले. त्याच वेळी मनूची आजी सावित्री देवी यांना त्यांच्या लहान मुलाच्या घरी लोहारु चौकात जायचे होते. त्यामुळे युद्धवीर यांनी त्यांच्या आईला दुचाकीवर बसण्यास सांगितले आणि ते एकत्र निघाले. मनू भाकरचे मामा हे दुचाकी चालवत कालियाना वळणाजवळ आले. त्याचवेळी समोरुन भरधाव वेगात कार येताना दिसली. हा कार उलट दिशेने येत होती आणि तिचा वेग प्रचंड होता. यावेळी कार चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानतंर ती कार थेट मनू भाकर यांच्या दुचाकीला जाऊन आदळली.


यावेळी युद्धवीर सिंग आणि सावित्री देवी हे रस्त्यावर पडून जखमी झाले. तर भरधाव वेगात येणारी कार ही रस्त्याच्या कडेला उलटी झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी मनू भाकरचे मामा आणि आजीचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून आरोपींचा शोध घेत आहे.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय