Raigad News : रायगडमधील २६ प्राथमिक शाळांना ठोकले टाळे! नेमकं कारण काय?

अलिबाग : खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल पहाता पटसंख्येअभावी रायगड जिल्ह्यातील (Raigad News) २६ शाळा बंद (Primary School) झाल्या आहेत. या शाळांमधील अन्य विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले जाणार आहे. सातत्याने घटणारी पटसंख्या ही चिंतेची बाब असून, खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कल हे यामागचे प्रमुख कारण ठरले आहे. मोफत शिक्षण, मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन यासारख्या सोयीसुविधा देऊनही रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यात शिक्षण विभागाला अपयश येत आहे. जिल्हा परिषदेच्या दोन हजार ५२८ शाळा कार्यरत होत्या. यांपैकी २६ शाळा पटसंख्याअभावी बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता सुरू असलेल्या शाळांची संख्या घटून दोन हजार ५०२ वर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षात शंभरहून अधिक शाळा बंद झाल्या आहेत.



जिल्ह्यात पहिली ते आठवी शाळेत ८७ हजार १४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांचा कल लक्षात घेतल्यास २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या अजून घटण्याची शक्यता आहे. बंद पडलेल्या २६ शाळांमध्ये अलिबाग तालुक्यातील दोन, पेण तालुक्यातील दोन, कर्जत तालुक्यातील एक रोहा तालुक्यातील सहा, माणगाव तालुक्यातील सहा, श्रीवर्धन तालुक्यातील तीन, पोलादपूर तालुक्यातील तीन, तर महाड तालुक्यातील तीन शाळांचा समावेश आहे. यात दुर्गम भागांतील शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे शाळा बंद पडल्याचा सर्वाधिक फटका हा दुर्गम भागांतील विद्याथांना बसणार आहे. त्यामुळे दुर्गम भागांतील पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.



शाळा सुरळीत ठेवण्याची मागणी


खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा हे शाळेतील पटसंख्या घटण्यामागचे मूळ कारण आहे. त्यामुळे शासकीय शाळांमधील पटसंख्या थोपवणे हे शिक्षण विभागासमोरील मोठे आव्हान असणार आहे. रायगड जिल्ह्याची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. काही तालुके हे अतिशय दुर्गम डोंगराळ आहेत. अशा दुर्गम भागांतील शाळा ज्याठिकाणी कमी पटसंख्या आहे, तिथे एक शिक्षक देऊन शाळा सुरळीत ठेवण्याची मागणी केली जात आहे. (Raigad News)

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण