Water Shortage : शहापूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरूच!

शहापूर : दरवर्षी पाणी टंचाई दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतांनाही शहापूरकरांच्या नशिबी मात्र पाणी टंचाईचे ग्रहण काही सुटतांना दिसत नाही त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहापूर तालुक्यात तानसा, वैतरणा, भातसा सारखी मोठ-मोठी जलाशये असतांनाही तालुक्यातील जनतेला जानेवारीच्या आरंभापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.



तालुक्यातील दुर्गम भागातील फुगाळा हद्दीतील आघानवाडी, कसाराखुद यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. पाण्यासाठी होणारी पायपीट त्यातून बुडणारी रोजंदारी यामुळे नागरिक हताश झाले आहे. यावर्षी पाऊस मुबलक पडूनही पाण्याची पातळी खालावत असल्याने कसाराखुर्द, फुगाळे परिसरातील विहिरीचे नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत. तर गावातील विहिरींनी तळ गाठला आहे काही ठिकाणी विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. फुगाळे हद्दीतील आघानवाडी वस्तीतील महिलांना सध्या गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असलेले नैसर्गिक पाझर शोधून हंडाभर पाणी टिपून भरण्याची वेळ आली आहे.



आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर 


डबक्यातील पाणी पिण्यासाठी वापरल्याने आरोग्याचा प्रश्न ही उपस्थित होणार आहे. या वस्तीला आता वेळीच टॅकरने पाणीपुरवठा न केल्यास साथीच्या रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असून या वस्तीला त्वरीत टॅकरने पाणीपुरवठा न केल्यास प्रशासनाला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.


शहापूर तालुक्यात पाणीटंचाई निवारणासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणत निधी खर्च केला जातो मात्र त्याचा विधायक परिणाम कुठेही होताना दिसत नाही, एकीकडे ग्रामीण भागात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आदिवासी बांधव मेटाकुटीस आले असताना आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा आहे. या टंचाई निवारणासाठी प्रशासनाला केव्हा जाग येईल, असे श्रमजीवी संघटना, सचिव प्रकाश खोडका यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Dombivli News : एकाने डोळे झाकले, दुसरा रील काढत होता अन् तिसरा...मोठागाव-माणकोली पुलावर स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवली : स्टंटबाजी आणि रिल्सच्या नादात स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांना आता पोलिसांचा दणका

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना