Kho Kho World Cup 2025: हु्ssर्रे....महिला संघानंतर भारताच्या पुरुष संघानेही जिंकला खो खो विश्वचषक २०२५

नवी दिल्ली: खो खो विश्वचषक २०२५मध्ये भारताच्या पुरुष संघाने नेपाळला ५४-३६ असे हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब आपल्या नावे केला. महिला संघानंतर पुरुषांच्या संघानेही दमदार कामगिरीच्या जोरावर ग्रुप स्टेजपासून ते फायनलपर्यंत एकही सामना गमावला नाही. फायनल सामन्यात महिलांनंतर पुरुषांनीही नेपाळला पूर्णपणे गुडघे टेकायला भाग पाडले आणि भारताचा झेंडा गर्वाने फडकावला. महिलांनंतर आता प्रतीक वायकरच्या नेतृत्वातील भारतीय पुरूष संघाने या खेळात इतिहास रचला.


भारतीय पुरुष संघ आणि नेपाळचा संघ यांच्यातील फायनल सामन्यातील स्कोरबोर्डवर एक नजर टाकल्यास सुरूवातीपासूनच टीम इंडियाने जोरदार आक्रमण केले होते. नेपाळच्या संघाने पहिल्यांदा टॉस जिंकत पहिल्यांदा बचाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. पहिल्या टर्नमध्ये प्रतीक आणि टीमने जबरदस्त खेळी करत २६ गुण मिळवले. दुसऱ्या टर्नमध्ये बचाव करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या बचावपटूंना नेपाळच्या आक्रमणाने चांगलेच धाववले. नेपाळने दुसऱ्या टर्नमध्ये १८ गुण मिळवले.



तिसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करताना प्रतीक वायकरच्या टीमने पुन्हा कमाल केली. त्यांनी नेपाळला सामन्यातून बाहेर केले. चौथ्या टर्नमध्ये भारताने बचावात्मक धोरण कायम राखताना नेपाळवर दबाव राखला आणि हा दबाव कायम राखला. अखेरीस हा सामना ५४-३६ असा संपला.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए