नवी दिल्ली: खो खो विश्वचषक २०२५मध्ये भारताच्या पुरुष संघाने नेपाळला ५४-३६ असे हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब आपल्या नावे केला. महिला संघानंतर पुरुषांच्या संघानेही दमदार कामगिरीच्या जोरावर ग्रुप स्टेजपासून ते फायनलपर्यंत एकही सामना गमावला नाही. फायनल सामन्यात महिलांनंतर पुरुषांनीही नेपाळला पूर्णपणे गुडघे टेकायला भाग पाडले आणि भारताचा झेंडा गर्वाने फडकावला. महिलांनंतर आता प्रतीक वायकरच्या नेतृत्वातील भारतीय पुरूष संघाने या खेळात इतिहास रचला.
भारतीय पुरुष संघ आणि नेपाळचा संघ यांच्यातील फायनल सामन्यातील स्कोरबोर्डवर एक नजर टाकल्यास सुरूवातीपासूनच टीम इंडियाने जोरदार आक्रमण केले होते. नेपाळच्या संघाने पहिल्यांदा टॉस जिंकत पहिल्यांदा बचाव करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. पहिल्या टर्नमध्ये प्रतीक आणि टीमने जबरदस्त खेळी करत २६ गुण मिळवले. दुसऱ्या टर्नमध्ये बचाव करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या बचावपटूंना नेपाळच्या आक्रमणाने चांगलेच धाववले. नेपाळने दुसऱ्या टर्नमध्ये १८ गुण मिळवले.
तिसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करताना प्रतीक वायकरच्या टीमने पुन्हा कमाल केली. त्यांनी नेपाळला सामन्यातून बाहेर केले. चौथ्या टर्नमध्ये भारताने बचावात्मक धोरण कायम राखताना नेपाळवर दबाव राखला आणि हा दबाव कायम राखला. अखेरीस हा सामना ५४-३६ असा संपला.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…