आमदार कालिदास कोळंबकरांचा विश्वविक्रम

मुंबई : सलग नऊ वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी विश्वविक्रमाची नोंद केली आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया या संस्थेने विश्वविक्रम धारक म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांची नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार कालिदास कोळंबकरांचा पदक आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.



दिवंगत आमदार गणपतराव देशमुख सोलापूरच्या सांगोल्यातून १० वेळा विजयी झाले होते. पण त्यांना हे विजय सलग मिळवता आलेले नाहीत. या उलट कालिदास कोळंबकर यांनी सलग नऊ वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरु करणाऱ्या कोळंबकर यांनी २००५ मध्ये नारायण राणेंसोबत सेना सोडली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. २०१९ मध्ये ते भाजपकडून निवडून आले. यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा ते भाजपाकडून निवडून आले.



वडाळा मतदारसंघात मराठी मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय मुस्लिम, पारशी, दलित मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. कोळंबकर यांनी पहिल्यांदा शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून ते अपराजित आहेत. तेव्हा ते नायगाव मतदारसंघातून विजयी झाले होते. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून कोळंबकर वडाळ्यातून विजयी होत आले आहेत.
Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला