आमदार कालिदास कोळंबकरांचा विश्वविक्रम

मुंबई : सलग नऊ वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेल्या आमदार कालिदास कोळंबकर यांनी विश्वविक्रमाची नोंद केली आहे. वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया या संस्थेने विश्वविक्रम धारक म्हणून आमदार कालिदास कोळंबकर यांची नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार कालिदास कोळंबकरांचा पदक आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वर्ल्ड रेकॉर्डस् बूक ऑफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.



दिवंगत आमदार गणपतराव देशमुख सोलापूरच्या सांगोल्यातून १० वेळा विजयी झाले होते. पण त्यांना हे विजय सलग मिळवता आलेले नाहीत. या उलट कालिदास कोळंबकर यांनी सलग नऊ वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरु करणाऱ्या कोळंबकर यांनी २००५ मध्ये नारायण राणेंसोबत सेना सोडली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. २०१९ मध्ये ते भाजपकडून निवडून आले. यानंतर २०२४ मध्ये पुन्हा एकदा ते भाजपाकडून निवडून आले.



वडाळा मतदारसंघात मराठी मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय मुस्लिम, पारशी, दलित मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. कोळंबकर यांनी पहिल्यांदा शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून ते अपराजित आहेत. तेव्हा ते नायगाव मतदारसंघातून विजयी झाले होते. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून कोळंबकर वडाळ्यातून विजयी होत आले आहेत.
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक