Ladki Bahin Yojana : दिल्लीतील महिलांनाही मिळणार ‘लाडक्या बहिणी’चा लाभ!

नवी दिल्ली : महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारनं (Mahayuti) लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलाच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हप्ते या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान आतापर्यंत ही योजना केवळ महाराष्ट्रातील महिलांसाठीच मर्यादित होती. परंतु आता दिल्लीतील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.



दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) भाजपाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतील महिलांनाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे दर महिन्याला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर घरगुती सिलिंडरवर ५०० रुपये सबसिडी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) म्हणाले की, भाजपाचा हा जाहीरनामा दिल्लीच्या विकासाची पायाभरणी करणारा आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे