School Admission : यंदाच्या शैक्षणिक सत्रात 'या' ५,०७२ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश!

पालघर : आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत (RTE) २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता जिल्ह्यातील २७२ शाळांनी नोंदणी केली असून, त्या शाळांअंतर्गत ५०७२ विद्यार्थ्यांना पहिलीत मोफत प्रवेश (School Admission) दिला जाणार आहे. यासाठी १४ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली असून बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.



ऑनलाइन अर्ज करण्यास २७ जानेवारीपर्यंत मुदत


'आरटीई' अंतर्गत पहिली आणि नर्सरीकरिता प्रवेश दिला जातो. यामध्ये एकूण २७२ शाळांमधून ५०७२ विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश दिला जाणार आहे, तर डहाणूमधील ६३ आणि जव्हारमधील ७ अशा एकूण ७० विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक म्हणजेच नर्सरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशांकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आता पालकांना बालकांचा ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.


पालकांनी या मुदतीत आपल्या पाल्याचा अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर एकाच ठिकाणाहून सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. तालुका डहाणू १५ शाळा जागा, जव्हार ३ शाळा ३७ जागा, पालघर ६९ शाळा ९१७ जागा, तलासरी १२ शाळा ११४ जागा, वसई १५३ शाळा ३६३७ जागा, विक्रमगड ७ शाळा ५८ जागा, वाडा १३ शाळा १४५ जागा अशा प्रकारचे शाळा आणि प्रवेश संख्यांच स्वरूप आहे. (School Admission)

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक