PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या नियमात होणार बदल!

  138

मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत (PM Kisan Yojana) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पीएम किसान योजनेत पारदर्शकता यायला हवी. तसेच खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा. यासाठी केंद्र सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला असेल असं मला वाटतं, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळं आता केंद्र सरकारनं नेमका पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत कोणता बदल केला असेल? अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत ४ महिन्याला २००० रुपयांचा हप्ता या प्रमाणे दिली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना जीएम किसान योजनेचे १८ हप्ते मिळाले आहेत. १९ वा हप्ता कधी मिळणार अशी देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. लवकरच म्हणजे पुढच्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणताही माहिती मिळाली नाही. मात्र, अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारने या योजनेच्या नियमात बदल केला असेल असं मला वाटतं असे एकनाथ शिंदे म्हणाले.


राज्यात जिथे जिथे विकासाची आवशकता आहे तिथे तिथे आम्ही विकास करु या विशस्वासाने लोक येत आहेत असे शिंदे म्हणाले. आजचं स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम मोदी करत आहेत. आज ६५ लाख लोकांना लाभ मिळाला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. पीएम किसान योजनेत पारदर्शकता यायला हवी, खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा, प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी केंद्राने नियमात बदल केला असेल असं मला वाटत असेही शिंदे म्हणाले. विचारांशी तडजोड आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्याने उबाठाची लोक येत आहेत. जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणुका आहेत तिथे तिथे आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवणार आहोत. काही ठिकाणी परिस्थिती नुसार कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित