Maharashtra Weather : थंडीचा जोर ओसरला,राज्यात ढगाळ वातावरण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका कमी झालेला दिसून येतोय. राज्यात ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. अनेक ठिकाणी मळभाचे वातावरण तयार झाले आहे.आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असणार आहे. कमाल तापमानातही २ ते ३ अंशानी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.


गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यामध्येही तापमानामध्ये चढउतार होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान असेच राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.



अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वाऱ्यांची स्थिती बदलली आहे. यामुळे तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अशा वातावरणातील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. ढगाळ वातावरण अथवा अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे.


दुसरीकडे उत्तर भारतात हिमवृष्टी होत आहे. तेथील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी तसेच धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी राज्यात मात्र दिवसा तापमानात वाढ पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य