Maharashtra Weather : थंडीचा जोर ओसरला,राज्यात ढगाळ वातावरण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका कमी झालेला दिसून येतोय. राज्यात ढगाळ वातावरण मात्र कायम आहे. अनेक ठिकाणी मळभाचे वातावरण तयार झाले आहे.आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असणार आहे. कमाल तापमानातही २ ते ३ अंशानी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.


गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यामध्येही तापमानामध्ये चढउतार होत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान असेच राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.



अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वाऱ्यांची स्थिती बदलली आहे. यामुळे तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अशा वातावरणातील बदलांमुळे राज्यातील शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. ढगाळ वातावरण अथवा अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे.


दुसरीकडे उत्तर भारतात हिमवृष्टी होत आहे. तेथील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी तसेच धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असला तरी राज्यात मात्र दिवसा तापमानात वाढ पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Haryana Pattern : कंत्राटी कामगारांसाठी 'हरियाणा पॅटर्न'चा अभ्यास करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, विशेषतः कंत्राटी

Skill Centre : राज्यात लवकरच १०० महात्मा ज्योतिराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू होणार

मुंबई : कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा ज्योतिराव फुले

Minister Shivendrasinharaje Bhosale : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घरे होणार अधिक प्रशस्त

चटई क्षेत्रफळात वाढ; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय मुंबई : राज्यातील शासकीय

Mathadi Workers : कंबरतोड ओझ्यापासून माथाडी कामगारांची सुटका

बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारक मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार

Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर धरणार; तर या राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : हिवाळा संपला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा इतका चढलाय की उष्माघाताने लोक आपल्या जीवाला

Shyam Steel in Maharashtra : श्याम स्टील आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाची राज्यात गुंतवणूक

मुंबई : राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत.